मुंबई : नवाब मलिकांकडून समीर वानखेडे (Nawab Malik VS Sameer Wankhede) यांच्यावर आरोप होत असताना आता क्रांती रेडकर (Kranti Redkar) यांनी रामदास आठवलेंची (Ramdas Athavale) भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत अर्धा तास चर्चा केली. त्यानंतर रामदास आठवले यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. ''समीर वानखेडे हे दलित अधिकारी आहेत. तसेच नवाब मलिकांच्या जावयावर कारवाई केली. त्यामुळे नवाब मलिक आरोप करत आहेत'', असं आठवले म्हणाले.
''ज्ञानेश्वर वानखेडे हे समीर वानखेडेंचे वडील आहे. ते मुस्लीम नाहीत. ते बाबासाहेबांचे अनुयायी आहेत. वाशिम जिल्ह्यातील वरुडतोफा गावचे रहिवासी आहेत. मुंबईत ते एक्साईज विभागात नोकरीला होते. क्रांती रेडकर या समीर वानखेडे यांच्या पत्नी आहेत. नवाब मलिक यांचा जावई तुरुंगात होता. त्यामुळे राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदाचा वापर करून ते वानखेडेंवर आरोप करत आहेत. वानखेडे एक दलित अधिकारी आहे.'' असं आठवले म्हणाले.
''आर्यन खानजवळ काही ड्रग्स सापडलं नाही, असं काही लोकांचं म्हणण असेल तर कोर्टाने २५ दिवस जामीन का दिला नाही? प्रभाकर साईलला पैसे देऊन त्याला समीर वानखेडेंवर आरोप करण्यास सांगितले आहे. वानखेडे कुटुंबीयांबाबत खोटं बोलले जात आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या अधिकाऱ्यावर अन्याय होत आहे. समीर वानखेडे यांच्यावर अन्याय होता कामा नये. जे काही असेल तर तुम्ही न्यायालयात जा आणि सिद्ध करून दाखवा. समीर वानखेडेंना पैसे खायचे असते तर त्यांनी असं लोकांना पकडलेच नाही.'', असंही आठवले म्हणाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.