

Ratnagiri Station Chaos
Esakal
कोकण रेल्वेच्या गाड्यांना असलेली गर्दी आणि तिकीट न मिळणं ही बाब सामान्य बनली आहे. गणपती, शिमगा सणाला गावी जाण्यासाठी तिकीट बूकिंग अवघ्या काही मिनिटात फुल्ल होतं. पण आता रत्नागिरीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. कन्फर्म तिकीट बूकिंग असूनही गाडीत असलेल्या परप्रांतियांच्या गर्दीमुळे प्रवाशांना प्लॅटफॉर्मवरच उभा रहावं लागलं. गाडी स्टेशनला येऊन निघून गेली तरी प्रवाशी गाडीत बसू शकले नाहीत. दरवाजात अनधिकृत प्रवासी उभा असल्यानं त्यांना आतही शिरता आलं नाही.