
Maharashtra Approves Rs 2215 Crore Aid for Farmers CM Fadnavis
Esakal
मराठवाड्यासह राज्यात गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टी सुरू आहे. या पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालंय. राज्यात पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचा निर्णय राज्य सरकारने घेतला. राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत मदत करण्याचा निर्णय़ घेण्यात आलाय. यानुसार २२१५ कोटींची मदत देण्यासाठी जीआर काढले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.