रस्ते अपघातात दररोज शेकडो लोकांचा जीव जातो. यादरम्यान एक धक्कादायक बाब समोर आली आहे. महाराष्ट्रात दरवर्षी रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दुचाकीस्वारांपैकी किमान ७२ टक्के चालक हे हेल्मेट न घतलेले होते. राज्य परिवहन विभागाच्या २०१९ ते २०२१ च्या ताज्या अपघातासंबंधीच्या माहिती विश्लेशणातून ही बाब समोर आली आहे.
या आकडेवारीनुसार २०२१ मध्ये महाराष्ट्रातील ६९ टक्के दुचाकी चालक (३,४०३) आणि ७९ टक्के दुचाकीवर मागे बसलेले लोकांचा मृत्यू झाला आहे ज्यांनी हेल्मेट घातलेले नव्हते. यासोबतच दुचाकी अपघातात मृत्यू होण्याचे प्रमाण २०२१ मध्ये २०१९ च्या तुलनेत १८ टक्के जास्त होते. तर मुंबईत ४० टक्के रस्ते अपघातात जीव गमवणारे ४० टक्के बळी हे दुचाकीस्वार होते असे आकडेवारीतून दिसून आले आहे. 'द टाइम्स ऑफ इंडीया'ने याबद्दलचे वृत्त दिले आहे.
परिवहन आयुक्त कार्यालयाने मुंबई आणि उर्वरित राज्यातील सर्व डीलर्सना दुचाकी खरेदीदारांना दोन हेल्मेट देणे सक्तीचे केले आहे. असे असूनही हेल्मेट घालण्याचे अनेकदा आवाहन करून देखील दुचाकीस्वार हे या हेल्मेट घालण्याच्या नियमाची पायमल्ली करताना दिसत आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.