मी कुठे जात नाही असे त्यांना वाटले असावे; आठवलेंची नाराजी

Ramdas Athwale
Ramdas Athwale

नाशिक : "भाजप-शिवसेना युती होताना आपणाला विचारले नाही. कदाचित, मी कुठे जात नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाटले असावे,' अशी नाराजी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज व्यक्त केली. रिपब्लिकन पक्षाला (आठवले गट) युतीत जागा न सोडल्याबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केले. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा भेटण्यासाठी निरोप होता, असाही गौप्यस्फोट त्यांनी केला. 

लोकसभेसाठी स्वतःला दक्षिण अथवा ईशान्य अथवा उत्तर-पूर्व मुंबई मतदारसंघाची आणि आणखी एक जागा हवी. त्यासाठी भाजप आणि शिवसेनेने प्रत्येकी एक जागा सोडावी. यासाठी लवकरच आपण मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत, असे सांगून आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप युतीसोबत आपण राहू इच्छितो, असेही स्पष्ट केले. आठवले यांनी सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणासंबंधीचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्यासाठी माझ्या पक्षाचा आग्रह आहे. तसेच सद्यस्थितीत इतर मागासवर्गियांना 27 टक्के आरक्षण असून त्यात आणखी 10 टक्के वाढ करून केंद्राने भटके-विमुक्तांना शिक्षण, नोकऱ्या आणि लोकसभा व विधानसभेसाठी 8 ते 9 टक्के आरक्षण द्यावे, यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.

मराठा समाजाला देण्यात आलेले 16 टक्के आरक्षण न्यायालयात टिकावे म्हणून राज्य सरकार प्रयत्न करत आहे. केंद्राने सवर्णांना शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये दिलेल्या 10 टक्के आरक्षणात मराठा समाजाला अधिक फायदा होणार आहे. त्याचप्रमाणे सर्वांना देण्यात आलेले 10 टक्के आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात अडचण येणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com