"आरटीई' प्रवेश प्रक्रिया रखडणार? 

"आरटीई' प्रवेश प्रक्रिया रखडणार? 

मुंबई - दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांच्या शालेय प्रवेशासाठी "आरटीई' (बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार) कायद्यानुसार राबवण्यात येणारी प्रक्रिया उत्पन्नमर्यादेतील घोळामुळे रखडली आहे. पात्रतेसाठी उत्पन्नमर्यादा आणि आरक्षण कसे राबवायचे, या प्रश्‍नाबाबत केंद्र व राज्य सरकारकडून अद्याप कोणतेही निर्देश मिळालेले नाहीत, असे सांगण्यात आले. 

दर वर्षी "आरटीई' प्रवेशप्रक्रिया विलंबाने सुरू होते; त्यामुळे राज्यभरात अत्यल्प प्रतिसाद मिळतो. यंदा ही प्रक्रिया फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच सुरू करण्याचा प्रयत्न शिक्षण विभागाकडून सुरू होता. केंद्र सरकारने 10 टक्के सवर्ण आरक्षण आणि राज्य सरकारने 16 टक्के मराठा आरक्षण लागू केले आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार होणाऱ्या प्रवेशांत या आरक्षणांची अंमलबजावणी करण्याबाबत शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे. 

"आरटीई' प्रवेशांसाठी असलेली उत्पन्नमर्यादा एक लाखावरून किती वाढवायची, याबाबतही नुकत्याच झालेल्या बैठकीत चर्चा झाली. पात्रतेसाठी उत्पन्नमर्यादा किती ठेवायची, या संदर्भात केंद्र सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही. सवर्ण आणि मराठा आरक्षणांतील लाभार्थींसाठी आठ लाख रुपये वार्षिक उत्पन्नाची मर्यादा ठरवण्यात आली आहे. त्यामुळे "आरटीई' प्रवेशासाठी सध्याची एक लाखाची मर्यादा वाढवण्यात येणार आहे. नवीन उत्पन्नमर्यादा ठरवण्यात आली नसल्याने "आरटीई' प्रवेशप्रक्रिया लांबणीवर पडत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com