पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काल सोमवारला करोनाचा प्रादूर्भाव वाढण्यास घाणेरडे राजकारण आणि महाराष्ट्र सरकारही (Maharashtra Government) जबाबदार असल्याचा आरोप केला होता. त्यांनी केलेल्या या आरोपाला महाराष्ट्राच्या राजकीय स्तरातून प्रतिक्रीया उमटत आहे. यातच काँग्रेस नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी भाजपवर ट्वीटद्वारे ताशेरे ओढले.
सचिन सावंत म्हणतात, “मोदीजींचे म्हणणे आहे की मुंबईतील उत्तर भारतीयांनी कोरोना पसरवला. त्यावेळी उत्तर भारतीयांना गावोगावी पाठवण्याची फुशारकी मारणारे भाजप नेते आज गप्प का आहेत? मोदींनी कोरोना सुपरस्प्रेडर म्हणत उत्तर प्रदेश आणि बिहारच्या जनतेचा अपमान केला आहे त्याबद्दल त्यांनी माफी मागावी.” सोबत देवेंद्र फडणवीसांचा (Devendra Fadnavis) एक जुना व्हिडीओ सुध्दा सावंतानी पोस्ट केलाय. त्यात फडणवीस केंद्र सरकारकडून वेळोवेळी ट्रेन उपलब्ध करण्याबाबत सांगताना दिसत आहे.
समोर आणखी एक ट्वीट करत सावंत म्हणाले, “उत्तर प्रदेश आणि बिहारच्या जनतेनी पंतप्रधान आणि भाजपच्या मनात त्यांच्याबद्दल किती आदर आहे, हे देखील समजून घेतले पाहिजे. मुंबई महानगरपालिका आणि उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला या अपमानाचे सडेतोड उत्तर मिळेल.”
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.