कल महाराष्ट्राचा : शिवसेना की राष्ट्रवादी, भाजपसोबत कोणी एकत्र यावं?

कल महाराष्ट्राचा : शिवसेना की राष्ट्रवादी, भाजपसोबत कोणी एकत्र यावं?
Summary

भाजपसोबत शिवसेना किंवा राष्ट्रवादीने एकत्र यावं का? या प्रश्नावर सर्व्हेमध्ये जनतेनं कुणाच्या बाजुने कौल दिला आहे हे सविस्तर जाणून घ्या.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारला येत्या २८ नोव्हेंबरला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने 'सकाळ आणि साम'नं (Sakal Saam Survey) मिळून एक सर्व्हे केला आहे. यामध्ये विविध प्रश्न विचारण्यात आले होते. यात भाजपसोबत शिवसेना किंवा राष्ट्रवादीने सोबत यावं का? असा प्रश्न विचारला होता. यावर भाजप-राष्ट्रवादी ऐवजी शिवसेना भाजपने पुन्हा एकत्र येण्याला जनतेनं कौल दिला आहे. राज्यात निकालानंतर भाजपसोबत युती तुटल्यानतंर शिवसेनेनं काँग्रेस राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी स्थापन केली. तर त्याआधी अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटे शपथ घेतली होती. त्यामुळे भाजप - राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चाही होत असतात. याच पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजप आणि भाजप-राष्ट्रवादी यांच्याबद्दल प्रश्न विचारला गेला होता.

तीन दशकांहून अधिक काळ शिवसेना-भाजप युती होती. त्यांच्या युतीला राज्यात बहुमत मिळाल्यानंतरही सत्ता स्थापन करता आली नाही. आता महाविकास आघाडीच्या सरकारला दोन वर्षे पूर्ण होत असताना शिवसेना भाजपने एकत्र यावं का असा प्रश्न विचारला असता तब्बल ५५ टक्के जनतेला असं वाटतं की दोन्ही पक्षांनी एकत्र येऊ नये. तर २८.५ टक्के जनतेला असं वाटतं की त्यांनी युती करावी.

कल महाराष्ट्राचा : शिवसेना की राष्ट्रवादी, भाजपसोबत कोणी एकत्र यावं?
महाविकास आघाडी की भाजपा, निवडणूक झाल्यास सत्ता कोणाची?

शिवेसनेसोबतची युती तुटल्यानंतर भाजप-राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा अनेकदा झाली. इतकंच काय तर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधीने राज्यात मोठी खळबळही उडवून दिली होती. त्याच पार्श्वभूमीवर या दोन्ही पक्षांनी एकत्र यावं का असं विचारण्यात आलं होतं. मात्र ७० टक्क्यांहून अधिक मतदारांनी अशी आघाडी नकोच म्हटलं आहे. तर फक्त १० टक्के लोकांनी भाजप-राष्ट्रवादी एकत्र यावं असं म्हटलं आहे.

कल महाराष्ट्राचा : शिवसेना की राष्ट्रवादी, भाजपसोबत कोणी एकत्र यावं?
Live: जनतेच्या मनातील मुख्यमंत्री कोण? काय म्हणतो सर्व्हे?

कसा झाला सर्व्हे?

राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघात सर्व्हे केला गेला. मिक्स्ड मेथडॉलॉजीचा वापर करून हा सर्व्हे करण्यात आला आहे. यासाठी विधानसभा २०१९ च्या निवडणुकीत मतदान केलेल्या मतदारांमधून रँडम असे सॅम्पल निवडण्यात आले. यात शहर, ग्रामीण आणि निमशहरी असा समतोल राखण्यात आला. तसंच सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्यांचे शिक्षण, आर्थिक सामाजिक बाजू, लिंग, वय इत्यादी निकषही लक्षात घेतले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com