Samruddhi Highway Accident : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरून प्रवास करत असलेल्या एका खासगी बसला 1 जुलैला पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला होता. त्यानंतर बसला भीषण आग लागली, या अपघातात 25 जणांचा मृत्यू झाला होता. सरकारने अपघातातील पीडितांना 25 लाख मदतीची घोषणा केली होती. मात्र अद्याप कोणतीही मदत मिळाली नसल्याचा आरोप पीडितांनी केला आहे.
अपघात झालेल्या परिवारातील लोक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील कार्यालय समोर रामनामाचा जप करणार आहेत. सहा महिने लोटून पीडित कुटुंबीयांना मदत मिळालीच नाही. तसेच दोषींवर काय कारवाई झाली असाही सवाल पीडितांनी उपस्थित केला. यापूर्वी पीडित परिवारातील नातेवाईकांनी वर्ध्यात केलं होतं उपोषण, मात्र त्यांना न्याय मिळालाच नाही. (Latest Marathi News)
सरकारने घोषणा केली पण प्रशासनाने पुढे नेलीच नाही. त्यामुळे 20 पीडित कुटुंबीयांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील जनसंपर्क कार्यालय समोर राम नाम जप करणार असल्याचा इशारा दिला आहे.
राम नाम जपातून संवाद होईल अशी अपेक्षा पीडित कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. उद्या (शुक्रवार) 19 तारखेला हे आंदोलन होणार आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.