
मुंबईः काल संजय राऊत यांची तुरुंगातून सुटका झाली. यानंतर राऊत यांनी 'मातोश्री'वर जात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मातोश्री निवासस्थानी एकत्रितपणे माध्यमांशी संवाद साधतांना संजय राऊत यांनी विविध मुद्द्यांना हात घातला.
जेलमध्ये असतांना काय केलं? या प्रश्नाचं उत्तर देतांना संजय राऊत म्हणाले की, आतमध्ये असतांना मी दोन पुस्तकं लिहिली आहेत. वर्तमानपत्रामध्ये ज्या बातम्या वाचल्या, जी पुस्तकं वाचली आणि ज्या काही आवडत्या गोष्टी लिहून ठेवल्या त्याची पुस्तकं लिहिणार आहे. शिवाय आलेल्या अनुभवांची डायरदेखील लिहिलेली असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं.
हेही वाचाः कोणाचे हिंदुत्व शाश्वत...बापुंचे की संघाचे?
तुरुंगात असतांना एका बातमीची आठवण राऊतांनी सांगितली. ''केरळमध्ये एका मंदिरात एक मगर रहायची. पण ही मगर शाकाहारी होती. जेव्हा तिची मृत्यू झाला तेव्हा मंदिर व्यवस्थापनाने या मगरीची अंत्ययात्रा काढून हिंदू पद्धतीने अंत्यविधी केला.'' ही बातमी आपल्याला आवड्याचं संजय राऊत यांनी सांगितलं.
संजय राऊत पुढे म्हणाले की, तुरुंगामधलं जीवन म्हणजे फक्त एकांतवास असतो. समोर फक्त भिंत दिसतं. माणूस दिसत नाही. असा अनुभव कुणालाही येऊ नये, असं संजय राऊत म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.