महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची सत्ता कधीच येणार नाही - संजय राऊत

'तुम्ही शब्द पाळला नाही म्हणून महाराष्ट्रातील जनतेला उत्तम सरकार मिळालं.'
Sanjay Raut News
Sanjay Raut Newse sakal

कोल्हापूर : तुम्ही शब्द पाळला नाही म्हणून महाराष्ट्रातील जनतेला उत्तम सरकार मिळालं. त्यामुळे तुमचे आभार, असा टोला शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला लगावला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील शिवसंपर्क अभियानात ते आज रविवारी (ता.२९) बोलत होते. यापुढे महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची सत्ता कधीच येणार नाही. माननीय बाळासाहेबांच्या प्रेरणातून शिवसेना उभी आहे. कोणी कितीही आपटले तरी काहीही होणार नाही, अशी टीका राऊतांनी देवेंद्र फडणवीसांसह भाजपवर (BJP) केली. (Sanjay Raut Say, In Future BJP Not Come Into Power In Maharashtra)

Sanjay Raut News
देशात बनावट नोटांची संख्या वाढली, विरोधकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

आज सकाळीच शाहू महाराजांच्या वाड्यात जाऊन आलो. आम्ही म्हणे संभाजीराजेंना फसवले. हे कोण म्हणतयं. तर भाजप. फसवाफसवीची भाषा करणारे आम्हाला म्हणतयं की आम्ही फसवलं, असे ते म्हणाले. या पुढेही उद्धव ठाकरे राज्याचे नेतृत्व करतील. शाहू छत्रपती बोलल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यापासून सर्व भाजपचे नेते आडवे झाले आहेत, असे राऊत म्हणाले.

Sanjay Raut News
कोल्हापूर: ‘आमचं ठरलंय’ म्हणणाऱ्यांनाही घरी बसवू ; संजय राऊत

शिवसेना प्रखर हिंदुत्ववाद्यांची संघटना आहे. काश्मीरमध्ये हल्ला झाला. काश्मीरमध्ये तीन महिन्यांमध्ये अतिरेक्यांचे ५८ हल्ले झाले. सैनिकांचा मृत्यू झालां. भाजपचे सरकार काय करत आहे, असा सवाल त्यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com