पवारांनी आत्मचिंतन करावे : फडणवीस 

पवारांनी आत्मचिंतन करावे : फडणवीस 

नागपूर - राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून अनेक जण बाहेर पडत आहेत. कुणी त्या पक्षात राहायला तयार नाही. यावर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आत्मचिंतन करावे, असा सल्ला देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज टोलाही लगावला. राष्ट्रवादीचे आणखी काही नेते भाजपमध्ये येणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले. 

राष्ट्रवादी पक्षातील चित्रा वाघ, मधुकर पिचड, सचिन पिचड, अशी मोठी यादी भाजपमध्ये जाणाऱ्यांची आहे. शरद पवार यांनी मुख्यंमत्र्यांवर दबावतंत्राचा वापर केल्याचा आरोप केला आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना टोलेबाजी केली. फडणवीस म्हणाले की, भाजपला कुणाच्याही मागे धावण्याची गरज नाही. साखर कारखाने तसेच सहकार क्षेत्रातील अडचणीबाबत सरकारने या नेत्यांना मदत केली. त्यामुळे आज ते भाजपमध्ये येत आहेत. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक आमदार भाजपात येण्यास इच्छुक आहेत. पण, त्यातून काही निवडक लोकच घेणार आहोत. ज्यांच्यावर ईडीची कारवाई सुरू आहे; अशा कोणालाही भाजप पक्षात घेणार नाही. आम्हाला अशा लोकांची गरज नाही. दबाव टाकून पक्षात या, हे म्हणण्याची आता भाजपवर वेळ राहिली नाही. भाजपकडे जनाधार आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे नेते आहेत. त्यामुळे लोकच आता भाजपात येतात, जे चांगले आहेत, लोकाभिमुख कामे करतात त्यातल्या निवडक लोकांना पक्षात घेतले जाईल. इतरांनी दुसऱ्या पक्षात जायचे ते जातील, भाजपने कधीही सुडाचे राजकारण केले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com