Sharad Pawar: साडे तीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा या सणाला विशेष महत्त्व आहे. वाईटावर विजयाचे प्रतीक म्हणून हा दिवस ओळखला जातो. आज महाराष्ट्राच्या राजकारणात देखील दसऱ्याला विशेष महत्त्व आहे. याचं कारण म्हणजे आज राज्यात उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, पंकजा मुंडे हे नेते दसरा मेळावा घेणार आहेत.
यातच आता तरुणांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी दसरा सणाचे औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली पुणे ते नागपूर तब्बल ८०० किलोमीटरच्या युवा संघर्ष यात्रेला सुरुवात झाली आहे.
या 'युवासंघर्ष' यात्रेच्या सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी टिळक स्मारक मंदिरात उपस्थित तरुणांना मार्गदर्शन केले. या यात्रेत खासदार श्रीनिवास पाटील, कामगार नेते बाबा आढाव, खासदार फौजिया खान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
या यात्रेच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी हिंजवडी IT पार्कचा किस्सा सांगितला आहे. शरद पवार म्हणाले, पुण्यापासून २० किमी वर एक साखर कारखाना होणार होता. त्या साखर कारखान्याच्या उद्घाटनाला नाना नवले यांनी मला बोलावलं होतं.
नाना नवले हे साखर कारखान्याचे चेअरमन होते. त्यांनी सहकारी साखर कारखाना काढण्याचं ठरवलं होतं. मी तिथे गेलो नारळ फोडला, कुदळ मारली, भाषणाला उभा राहिलो आणि सांगितलं की इथे कारखाना होणार नाही.
ते म्हणाले भूमिपूजनाला बोलावलं आणि सांगताय की साखर कारखाना होणार नाही. मी म्हणालो तुम्हाला कारखान्यासाठी दुसरी जागा देतो पण इथे कारखाना होणार नाही ते म्हणाले मग इथे काय होणार मी म्हणालो इथे IT पार्क होणार. आज हिंजवडीमध्ये मोठं IT पार्क उभा राहिलं आहे. असा किस्सा शरद पवार यांनी या कार्यक्रमा दरम्यान सांगितला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.