
Marathwada Faces Flood Crisis Government Urged to Act Immediately
Esakal
Marathwada Faces Flood Crisis: राज्यात गेल्या आठवड्याभरापासून पावसाचा जोर वाढला आहे. पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात काही भागात अतिवृष्टी झालीय. मराठवाड्यात दुष्काळी भागातही पावसानं झोडपलं असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालीय. शेतकऱ्याचं हाता तोंडाशी आलेलं पीक पावसाने हिरावून घेतलंय. राज्यात सुरू असलेला पाऊस आणि नुकसानीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिलीय. शेतकरी संकटात सापडला आहे. पिकं कुजून गेली आहेत तर सोयाबीन उद्ध्वस्त झालंय. शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं असून सरकारने त्यांना मदत करावी अशी मागणी शरद पवार यांनी केलीय.