

Government build Shelters for stray dogs
ESakal
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात शुक्रवारी, राज्यातील भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या आणि त्यामुळे सर्वसामान्यांना निर्माण होणारा धोका हा मुद्दा जोरदारपणे मांडण्यात आला. शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोटकर यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडून हा मुद्दा उपस्थित केला आणि सरकारकडे कठोर कारवाईची मागणी केली.