मुंबई - सोयाबीन, कापूस, भात, तूर व हरभरा या प्रमुख पिकांवरील कीड व रोगांच्या व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत कीडरोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प राबविण्यात येत असून, शेंद्ररी बोंड अळी नियंत्रणासाठी 17 कोटी इतका निधी वितरित केला आहे.
राष्ट्रीय कृषी विकास योजना 2009-10 ते 2012- 13 या कालावधीत राबविण्यात आला आहे. यानंतर 2013-14 पासून नियमितपणे राज्य योजनेतून कीडरोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प राबविण्यात येत आहे. यामध्ये पिकांवरील कीडीच्या नियंत्रणासाठी प्रयत्न केले जातात. विशेषतः सोयाबीन, कापूस, भात, तूर व हरभरा या पिकांवरील कीडीसाठी या योजनेतील निधी दिला जातो. 2018-19 मध्ये यासाठी 41 कोटी 47 लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली. यापैकी 16 कोटी 97 लाख इतका निधी वितरित करण्यात येणार आहे. हा निधी कृषी आयुक्त कार्यालयामार्फत वितरित केला जाणार आहे.
|