Shivaji Maharaj Ashes in Kolhapur
esakal
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचं दैवत. अशा या दैवताने ३ एप्रिल १६८० रोजी रायगडावर अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर राजाराम महाराजांनी महाराजांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. तसेच त्यांच्या शिवरक्षा व अस्थी रायगडावरील जगदीश्वर मंदिराजवळ पुरण्यात आल्या. या घटनेला आता जवळपास ३४५ वर्षे उलटली आहेत. पण, तुम्हाला जर म्हटलं की या अस्थी आजही जपून ठेवण्यात आल्या आहेत? तर.. तर आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे. कोल्हापुरात आजही महाराजांच्या अस्थी जपून ठेवण्यात आल्या आहेत. अनेक शिवभक्त आजही या अस्थींच दर्शन घेऊ शकतात.