मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका प्रामाणिक नाही - आमदार राजू पाटील

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास दि. बा. पाटील यांचे नाव देण्यास आपला पाठिंबा असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भूमीपुत्रांना आश्वासन दिले.
MLA raju patil
MLA raju patilsakal
Summary

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास दि. बा. पाटील यांचे नाव देण्यास आपला पाठिंबा असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भूमीपुत्रांना आश्वासन दिले.

डोंबिवली - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास दि. बा. पाटील यांचे नाव देण्यास आपला पाठिंबा असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भूमीपुत्रांना आश्वासन दिले. यामुळे भूमीपुत्रांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तूर्तास तरी या क्षणाला मी त्यांच्या भूमिकेचे स्वागत करतो, पण मला ती प्रामाणिक वाटत नाही हे ही मी नमूद करतो असे सांगत मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

मंगळवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी शिवसेनेने कधीही बाळासाहेब यांचे नाव नवी मुंबई या आंतरराष्ट्रीय विमानतळास देण्याचा प्रस्ताव मांडला नाही. एकनाथ शिंदे यांच्यानुसार सिडकोने तो प्रस्ताव मांडला होता. मात्र तो कधीही राज्य शासनाकडे मंजुरीसाठी आला नाही. असे सांगत आपला दि. बा. यांच्या नावाला पाठिंबा असल्याचे जाहीर करत ठाणे व रायगड जिल्ह्यातील भूमीपुत्रांचे मन जिंकण्याचा प्रयत्न केला आहे.

गेले वर्षभर भूमीपुत्र विविध मार्गांनी दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळास दिले जावे यासाठी लढा देत आहेत. राज्यातील विविध पक्षांचे नेते पहिले भूमीपुत्र असल्याने त्यांनी पक्षाची पर्वा न करता या आंदोलनात सहभाग घेतल्याचे पहायला मिळाले आहे. मात्र राज्य सरकार केंद्राकडे तर केंद्र सरकार राज्याकडे बोट दाखवत असल्याने हा प्रश्न प्रलंबित होता. या आंदोलनात मनसे आमदार राजू पाटील यांची देखील महत्वाची भूमिका राहिली आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी दि.बा. यांच्या नावास पाठिंबा देताच मनसे आमदार पाटील म्हणाले, त्यांनी जी भूमिका घेतली त्याचे आम्ही स्वागतच करतो. मात्र मुख्यमंत्री ठाकरे यांना मला हा प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा आम्ही कृती समिती म्हणून त्यांनी बोलविलेल्या मिटींगला गेलो होतो. त्या मिटिंग मधून अर्ध्यात उठून ते का गेले होते ? तेव्हा त्यांनी त्यांची भूमिका का समोर ठेवली नाही. ते मंत्री एकनाथ शिंदे यांना एवढे घाबरतात का ? त्यांच्या शब्दाचा एवढा मान ठेवतात की त्यांनी सांगितले होते म्हणून, माझं मत नव्हते असे बोलले.

कुठेतरी सरकार निसटत आहे आणि हे निसटताना एक सहानुभूती घ्यायची म्हणून त्यांचा हा प्रयत्न आहे, असे मला वाटते. हा निर्णय आमच्या समाजासाठी खूप महत्वाचा आहे. त्यामुळे या निर्णयाचे मी मनापासून स्वागत करतो.

याचा पाठपुरावा त्यांनी करावा. अर्थात सरकार असेल नसेल नामकरण आता लगेच झाले नाही. तरी आम्ही यापुढे पण कृती समितीच्या माध्यमातून स्थानिक आमदार, लोकप्रतिनिधी म्हणून पुढे नेणार आहोत. त्यामुळे तूर्तास तरी या क्षणाला मी त्यांच्या भूमिकेचे स्वागत करतो, पण मला ती प्रामाणिक वाटत नाही हे मी नमूद करतो असे पाटील यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com