वायू प्रदूषणाचा विळखा वाढतोय 

वायू प्रदूषणाचा विळखा वाढतोय 

मुंबई - राज्यातील विशेषतः मुंबई, नवी मुंबई, पुणे, चंद्रपूर, नागपूर व सोलापूर शहरांतील वायू प्रदूषणाची परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात म्हटले आहे. यामुळे या शहरातील प्रत्येकी दहा व्यक्तींपैकी नऊ जण प्रदूषित हवेमुळे बाधित असल्याचे अहवालात म्हटले आहे. 

राज्यातील एकूण वायू प्रदूषणात 29 टक्के प्रदूषण ओद्योगिक प्रकल्पातून होते. या पार्श्वभूमीवर राज्य प्रदूषण मंडळानेदेखील आपला अहवाल राज्य सकारला दिला आहे. यामध्ये मुंबईतील चेंबूर, सायन, पुण्यातील कर्वे रस्ता, नळस्टॉप आणि स्वारगेट येथील प्रदूषण गंभीर असल्याचे म्हटले आहे. यामुळे नागरिकांना श्‍वसनाचा त्रास होत आहे. 

जागतिक आरोग्य संघटना आणि राज्य प्रदूषण मंडळाच्या अहवालानुसार मुंबईत 50 ठिकाणी तसेच पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, व चंद्रपूर या शहरात प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसविण्याबरोबर आणि हवेतील वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी स्ट्राटा इनव्हिरो कंपनीने पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्याकडे सादरीकरण केले आहे. मुंबई आणि अन्य शहरांत वाहने, इमारतींच्या बांधकामातील धूलिकण, धूर यामुळे होणार प्रदूषण शास्त्रोक्त पद्धतीने कमी करण्यासाठी अधिक भर देणे आवश्‍यक असल्याचे स्ट्राटा कंपनीने म्हटले आहे. 

अहवालातील माहिती 
:- 10 पैकी 9 लोकांना वायू प्रदूषणाचा त्रास 
:- 29 टक्के प्रदूषण ओद्योगिक प्रकल्पांतून 
:- सल्फर डायऑक्‍साईडमध्ये 54, तर नायट्रस ऑक्‍साईडमध्ये 147 माइक्रोग्रॅम प्रतिलिटर वाढ 

हवेच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करण्यासाठी राज्यातील 17 प्रदूषित शहरांचा कृती आराखडा तयार करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. 
- रामदास कदम, पर्यावरणमंत्री 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com