सोलापूर जिल्हा बॅंक कर्जवाटपात राज्यात अव्वल! दहा बॅंकांनी आखडला हात

शेतकऱ्यांना २०२१-२२ मधील रब्बी व खरीप हंगामात २० हजार ५८४ कोटींचे पीककर्ज वाटप करावे, असे टार्गेट राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीने दिले होते. पण, ३१ मार्च २०२२ पर्यंत राज्यातील ३१ जिल्हा बॅंकांपैकी दहा बॅंकांनी ८० टक्क्यांपेक्षा कमी कर्जवाटप केल्याची माहिती राज्य बॅंकेकडून देण्यात आली.
pik-karj.jpg
pik-karj.jpgESAKAL

सोलापूर : राज्यातील जवळपास ६७ लाख शेतकऱ्यांना २०२१-२२ मधील रब्बी व खरीप हंगामात २० हजार ५८४ कोटींचे पीककर्ज वाटप करावे, असे टार्गेट राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीने दिले होते. पण, ३१ मार्च २०२२ पर्यंत राज्यातील ३१ जिल्हा बॅंकांपैकी दहा बॅंकांनी ८० टक्क्यांपेक्षा कमी कर्जवाटप केल्याची माहिती राज्य बॅंकेकडून देण्यात आली. त्यामुळे राज्यातील जवळपास सात लाख शेतकऱ्यांना विशेषत: कर्जमाफीचा लाभ घेतलेल्यांना बॅंकांकडून पीककर्ज मिळू शकले नाही.

pik-karj.jpg
मुंबईत कोरोना रुग्णात वाढ; १७ मार्चनंतर एका दिवसात सर्वाधिक रुग्ण

राज्यातील शेतकऱ्यांना खासगी सावकारांच्या दारात जाण्याची वेळ येऊ नये, शेतकरी आत्महत्या थांबाव्यात, शेतीच्या प्रगतीसाठी हातभार लागावा या हेतूने राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीकडून दरवर्षी कर्जवाटपाचे उद्दिष्ट दिले जाते. राज्यातील ३१ जिल्हा बॅंकांनी शेतकऱ्यांना १०० टक्के कर्जवाटप करणे अपेक्षित असते. मात्र, बॅंकांकडून कर्ज घेऊन कर्जमाफीची वाट पाहणारे बरेच शेतकरी आहेत. दुसरीकडे प्रोत्साहनपर अनुदान व दोन लाखांवरील शेतकऱ्यांना अजूनही कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. या पार्श्वभूमीवर बॅंकांनी कर्जवाटप करताना हात आखडता घेतल्याची स्थिती आहे. तरीही, शेतकऱ्यांना वेळेत कर्ज मिळाल्यास त्यांच्या अडचणी दूर होतील या हेतूने राज्य सहकारी बॅंकेकडून अर्थसहाय केले जाते. २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी राज्य बॅंकेने मुंबइ, ठाणे, वर्धा जिल्हा बॅंक वगळता २८ जिल्हा बॅंकांना आठ हजार ८९२ कोटींचे कर्ज मंजूर केले. त्यानुसार २२ जिल्हा बॅंकांनी जवळपास सात हजार कोटींचे कर्ज घेतले. तरीही, सांगली, जळगाव, ठाणे, औरंगाबाद, उस्मानाबाद, बुलढाणा, परभणी, अकोला, अमरावती, नागपूर या जिल्हा बॅंकांनी ८० टक्क्यांपेक्षा कमी कर्जवाटप केल्याची बाब राज्य बॅंकेकडील माहितीवरून स्पष्ट झाले आहे. आता राज्य सरकारने तीन लाखांपर्यंचे कर्ज बिनव्याजी केले, पण बॅंकांनी उद्दिष्टानुसार कर्जवाटप करावे, अशी शेकऱ्यांना आशा आहे.

pik-karj.jpg
ऑफलाइन परीक्षेसाठी पदवीच्या विद्यार्थ्यांना मिळणार अतिरिक्त वेळ

शेती कर्जाची स्थिती (२०२१-२२)
राज्य बॅंकेकडून वितरीत कर्ज
६९२८.२२ कोटी
खरीप-रब्बीसाठीचे टार्गेट
२०,५८४.१९ कोटी
जिल्हा बॅंकांकडून कर्ज वितरीत
१६,९४२ कोटी
कर्जवाटप न केलेली रक्कम
३,६४२.१९ कोटी

pik-karj.jpg
शिवरायांचं प्रतिक असलेल्या तलवारीवरुन इतकी तौबा का? राजू पाटलांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

अडचणीतील सोलापूर डीसीसी राज्यात अव्वल
राज्यातील ३१ पैकी पाच जिल्हा बॅंकांनी शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामात १०० टक्क्यांपेक्षा अधिक कर्जवाटप केले आहे. सोलापूर जिल्हा बॅंक राज्यात अव्वल ठरली असून विशेष म्हणजे १०० वर्षांची जुनी बॅंक अडचणीत आल्याने सध्या बॅंकेवर प्रशासक आहे. दुसरीकडे धुळे, नांदेड, सातारा, रायगड, भंडारा या बॅंकांचे कर्जवाटप १०० टक्क्यांपेक्षा अधिक झाले आहे.पुणे, जालना, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गोंदिया या बॅंकांचे कर्जवाटपही ९० टक्क्यांहून अधिक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com