संत रचनांमध्ये विश्‍व कल्याणाचा भाव

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे प्रतिपादन
bhagat-singh-koshyari
bhagat-singh-koshyarisakal media

कोल्हापूर : ‘‘भगवान बुद्धांपासून ते संत ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, तुलसीदास अशा अनेक संतांनी विविध रचना, साहित्य असो वा ‘वैष्णव जन तो’ ही प्रार्थना असो, या सर्वांची भाषा वेगवेगळी आहे मात्र सर्वांचा भाव एकच आहे. तो विश्व कल्याणाचा भाव आहे. ’’ असे मत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे व्यक्त केले.

अमरवाणी इव्हेन्टस फाउंडेशन पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, केंद्रीय संस्कृतिक मंत्रालय, इंडसमून मीडिया यांच्या तर्फे पहिले विश्वात्मक संत साहित्य संमेलन येथे भरले आहे. स्वागताध्यक्ष डॉ. प्रा. सदानंद मोरे म्हणाले की, संत वाड्मयापर्यंतची वैचारिकता भारताला लाभली आहे. नैतिकशास्त्र शिकवणारे संत साहित्य समजून घेण्यासाठी हे संमेलन महत्त्वाचे आहे.

विश्व कल्याणाचा विचार वाढीस लागावा

संमेलनाध्यक्ष न्यायाधीश डॉ. मदन महाराज गोसावी म्हणाले की, संतांचे तत्वज्ञान आहे. इतर संप्रदायातील तत्वज्ञान आहे. त्यात समानतेचा धागा शोधण्यात येतो त्याचा अभ्यास करावा लागेल. त्यासाठी व्यासपीठावर असावे म्हणून हे संमेलन आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com