"राज्य सरकारने समिती नेमण्याचा निर्णय घेतल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी थांबावे"

Bhai Jagtap
Bhai Jagtapsakal media

मुंबई : राज्य परीवहन मंडळाचे (ST bus corporation) राज्य सरकार (mva government) मध्ये विलीनीकरण (merge) व्हावे ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे. आता राज्य सरकारने यासाठी समिती नेमण्याचा (committee appoint) निर्णय घेतला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आता आपली पाऊले मागे घेण्यास हकरत नाही. अशी भूमिका आज महाराष्ट्र एसटी कर्मचारी कॉंग्रेसचे अध्यक्ष व काँग्रेसचे आमदार भाई जगताप (bhai Jagtap) यांनी मांडली.

Bhai Jagtap
कोरोनानंतर मुंबई महापालिका रुग्णालये होणार आणखी सुसज्ज

एसटीचे राज्य सरकार मध्ये विलीनीकरण व्हावे ही मागणी दोेन दशकांपासून सुरु आहे.मात्र,गेल्या पाच-दहा वर्षात परिस्थिती खालावली.16 महिन्यांच्या कोविड काळात परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. माजी परीवहन मंत्री दिवाकर रावते यांनीही एसटीच्या विलीनीकरणाची तयारी दाखवली होती. असे सांगत भाई जगताप पुढे म्हणाले, विद्यमान परीवहन मंत्री अॅड.अनिल परब यांच्याशीही बोलणं झाले आहे. त्यांनी समिती नियुक्त करणार असल्याचे सांगितले.

आता राज्य सरकार समिती नियुक्त करणार आहे. पण, अजून स्पष्टता येणे अपेक्षीत आहे.समितीत कोण कोण सदस्य असतील त्याची माहिती मिळायला हवी. यात राज्य सरकारची भूमिकाही महत्वाची ठरणार आहे. सरकार आता समिती नेमत असेल, ज्या कारणासाठी आंदोलन सुरु आहे त्या कारणाला दिशा मिळत असेल. तर आता थांबायला हवे असे भाई जगताप यांनी नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com