एसटीच्या 20 फेऱ्या ऐन सुटीत बंद 

एसटीच्या 20 फेऱ्या ऐन सुटीत बंद 

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बसचालक आणि वाहकांना इच्छित स्थळी बदली दिल्यामुळे मुंबईत चालक-वाहकांची कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे मुंबई-हुबळी शिवशाही आणि मुंबई-हैदराबाद या आंतरराज्य मार्गांसह 20 एसटी बस सेवा बंद झाल्या आहेत. परिणामी उन्हाळ्याच्या सुटीत गावाला, सहल आणि पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. याचा सर्वाधिक फटका प्रत्येकी सहा बस सेवा बंद झालेल्या अलिबाग आणि भिवंडी परिसरातील प्रवाशांना बसला आहे. 

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी एसटी महामंडळाने घाईघाईत बदली प्रक्रिया राबवली. महामंडळाने 3307 वाहक-चालकांची इच्छित स्थळी बदली करून त्यांना दिलासा दिला, परंतु मुंबई विभागातील बदली झालेल्या वाहक-चालकांच्या रिक्त जागांवर अन्य ठिकाणांहून कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे नियोजन झाले नाही. त्यामुळे मुंबईबाहेर जाणाऱ्या बस चालक-वाहकांअभावी आगारातच उभ्या आहेत.

हजारो कोटींच्या तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाला अनेक मार्गांवरील फेऱ्या बंद झाल्यामुळे आणखी नुकसान सोसावे लागणार आहे. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com