

Farmer Stamp duty waiver
ESakal
मुंबई : महाराष्ट्र सरकारने राज्यातील लाखो शेतकऱ्यांना नवीन वर्षाची एक महत्त्वाची भेट दिली आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केले की, २ लाख रुपयांपर्यंतच्या कृषी आणि पीक कर्जाशी संबंधित सर्व कागदपत्रांवरील मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आले आहे. हा निर्णय १ जानेवारी २०२६ पासून राज्यभरात लागू झाला आहे आणि या संदर्भात अधिकृत राजपत्र जारी करण्यात आले आहे.