Working Hours: कामाचे तास वाढले! आता 'या' कर्मचाऱ्यांना करावं लागणार १२ तास काम; शासनाचा महत्त्वाचा निर्णय

State Cabinet Meeting: राज्यात गुंतवणूक आकर्षित करणे आणि रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी कामाच्या वेळेत बदल करण्यात आले आहेत. आता कारखान्यातील दैनंदिन कामाच्या तासांची मर्यादा नऊ तासांवरून १२ तासांपर्यंत होणार आहे.
Working Hours Increase

Working Hours Increase

ESakal

Updated on

मुंबई : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या कृती दलाने सुचविलेल्या सुधारणांनुसार कारखाने अधिनियमात विविध सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. यामुळे आता कारखान्यातील दैनंदिन कामाच्या तासांची मर्यादा नऊ तासांवरून १२ तासांपर्यंत होणार आहे. राज्यात गुंतवणूक आकर्षित करणे आणि रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी हे बदल करण्यात आले असल्याचे शासनाचे म्हणणे आहे. कर्नाटक, तमिळनाडू, तेलंगण, उत्तर प्रदेश, त्रिपुरा यांसारख्या राज्यांनी हे बदल आधीच केलेले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com