
Working Hours Increase
ESakal
मुंबई : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या कृती दलाने सुचविलेल्या सुधारणांनुसार कारखाने अधिनियमात विविध सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. यामुळे आता कारखान्यातील दैनंदिन कामाच्या तासांची मर्यादा नऊ तासांवरून १२ तासांपर्यंत होणार आहे. राज्यात गुंतवणूक आकर्षित करणे आणि रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी हे बदल करण्यात आले असल्याचे शासनाचे म्हणणे आहे. कर्नाटक, तमिळनाडू, तेलंगण, उत्तर प्रदेश, त्रिपुरा यांसारख्या राज्यांनी हे बदल आधीच केलेले आहेत.