Exam
महाराष्ट्र बातम्या
HSC Exam: विद्यार्थ्यांना दिलासा! बारावीच्या अर्जास मुदतवाढ, शासनाचा निर्णय
Education: अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे अनेक बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यास अडचण येत होत्या. त्यामुळे राज्य परीक्षा मंडळाने बारावीच्या परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ दिली आहे.
मुंबई : राज्यात होत असलेली अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यास अडचण येत असल्याने २० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य परीक्षा मंडळाने घेतला आहे. यासोबतच दहावीच्या परीक्षेत १७ नंबरचा अर्ज भरून खासगीरीत्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यासाठी १५ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.