राज्यातील सहा आमदार संसदेत

Parliament
Parliament

राज्यातील सहा आमदार संसदेत निवडून आले आहेत, तर अन्य कारणांमुळे आणखी चार आमदारांनी राजीनामे दिले आहेत, त्यामुळे फडणवीस सरकारच्या शेवटच्या विधिमंडळ अधिवेशनात दहा आमदार गैरहजर असतील.

लोकसभा निवडणुकीत विविध पक्षांचे १४ आमदार जनमताचा कौल आजमावत होते. त्यापैकी सहा आमदार राज्यातून लोकसभा निवडणुकीत निवडून आले आहेत. पुण्यातील भाजप आमदार आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये विजय मिळवला आहे, त्यामुळे त्यांना आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. औरंगाबादमधून ‘एमआयएम’चे आमदार इम्तियाज जलील हे संसदेवर गेले आहेत. विदर्भातील शिवसेनेचे आमदार सुरेश धानोरकर हे काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले आहेत. 

चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील, नांदेडमधील आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, हिंगोलीतील आमदार हेमंत पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत विजयी ठरल्याने त्यांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com