मुंबई: राज्यात कोरोना विषाणुमूळे वाहतुकदारांच्या प्रचंड समस्या निर्माण झाल्या आहे. त्यामूळे राज्यातील एसटी महामंडळ, बेस्ट उपक्रम अशा सार्वजनिक प्रवासी वाहतूकीसह ट्रक, टेम्पो, टँकर्स,बस वाहतूक, आॅटोरिक्षा, टॅक्सी, ओला उबर या खासगी वाहतुकदारांच्या अडचणीत प्रंचड वाढ झाली आहे. त्यामूळे परिवहन मंत्री अॅड.अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील वाहतूकदारांच्या समस्या सोडवण्यासाठी राज्यस्तरीय 13 सदस्यीय कृती दलाची स्थापना केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्यात मिशन बिगीन अगेन राबवल्या जात आहे. त्या अंतर्गतच राज्य परिवहन विभागाकडून वाहतूकदारांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासोबतच अनलाॅक 1 नंतर हळुहळू राज्यातील परिस्थिती पुर्वपदावर आणतांना काय उपाययोजना करायच्या, प्रवासी वाहतूक कशी सुरू करायची, कोणत्या वाहतुदरांना परवानगी द्यायची, त्यांच्या समस्या काय ? अशा विविध विषयांवर या समितीच्या माध्यमातून लक्ष केंद्रीत केले जाणार आहे.
त्यासाठी या समितीमध्ये राज्यातील विविध मालवाहतूक संघंटना, प्रवासी वाहतूक संघंटना, आॅटो रिक्षा, टॅक्सी, टॅक, टेम्पो अशा विविध वाहतूकदारांचे प्रतिनीधी, नागरि परीवहन उपक्रमांच्या प्रतिनिधींचा राज्यस्तरीय कृती दलामध्ये समावेश करण्यात आला आहे.
हे असेल कृती दलाचे कार्य:
- राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, वाहतूकींशी संबंधीत बाबींमूळे होणार परिणाम, वाहतूक व्यवस्थेतील अडीअडचणी, समस्या, या बाबतींचा अभ्यास करून उपाययोजना करणे,
- परिस्थितीनुरूप वेळोवेळी निदर्शनास आलेल्या वस्तुस्थिती लक्षात घेऊन त्यावरील उपाययोजनेसह निर्णय घेणे
- सदर कृती दलाच्या बैठका या दुरचित्रवाणी परिषद व्हिडीओ कॉन्फरंन्स याद्वारे आयोजीत करण्यात येतील
राज्यस्तरीय कृती दलातील पदे:
state transport minister made action force for problems of transporters
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.