वळवाच्या पावसाची राज्यात यंदा दडी

Rain
Rain

पुणे - दुष्काळात होरपळणाऱ्या महाराष्ट्रात पूर्वमोसमी पावसानेही (वळीव) या वर्षी आतापर्यंत हजेरी लावली नाही. मुंबई, पालघर आणि नगरमध्ये तर वळवाची एकही सर पडली नाही. त्यामुळे राज्यातील उन्हाचा चटका वाढत असल्याचे निरीक्षण हवामान खात्याने नोंदविले आहे.

राज्यात १ मार्च ते १९ मे या ८० दिवसांमध्ये राज्यात २१.१ मिलिमीटर सरासरी पाऊस पडतो. यंदा जेमतेम ६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, सरासरीच्या तुलनेत ७१ टक्के कमी पाऊस पडला आहे. शेतीसाठी वळवाचा पाऊस वरदान असतो. तसेच, शहरांमध्येही वाढलेल्या उन्हाच्या चटक्‍यामुळे कमी होतो. मात्र, वाढलेल्या उन्हाची काहिली कमी करणारा वळीव आतापर्यंत महाराष्ट्रात पुरेसा पडलाच नाही, असे निरीक्षण हवामान खात्यातर्फे नोंदविण्यात आले आहे. 

हवमान उपविभाग ...... सरासरी ..... प्रत्यक्ष पडलेला पाऊस ....... सरासरीच्या तुलनेत टक्केवारी 
मध्य महाराष्ट्र ............. १९.३ ........ ७ ............................. -६४
मराठवाडा  ................ १६.६ ....... ५.९ ........................... -६४
विदर्भ  .................... २४.५ ........ ६.६  ........................ - ७३
कोकण .................... ७.५ ........ ०.७  ........................... -९०
(१ मार्च ते १९ मेदरम्यानची आकडेवारी. स्रोत ः भारतीय हवामान विभाग)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com