आत्महत्या २६ हजार; पात्र १३ हजार

आत्महत्या २६ हजार; पात्र १३ हजार

मुंबई - गेल्या बारा वर्षांत राज्यात झालेल्या २६ हजार आत्महत्यांपैकी केवळ ५० टक्केच पीडित शेतकरी कुटुंब हे सरकारी मदतीस पात्र ठरल्याची माहिती पुढे आली आहे. राज्य सरकारच्या मदत व पुनर्वसन विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, २००६ ते जून २०१८ दरम्यान राज्यात झालेल्या २६,६४५ शेतकरी आत्महत्यांपैकी केवळ १३,४३४ आत्महत्या सरकारी मदतीस पात्र ठरल्या आहेत. त्यातील १३,३७० शेतकरी कुटुंबांनाच प्रत्यक्ष मदतीचा लाभ झाला आहे.

राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने कर्जमाफी दिल्याचा दावा केला; मात्र सरकारनेच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या चार वर्षांत जवळपास ११ हजार शेतकरी आत्महत्या झाल्याचे समोर आले. दरम्यान, याच काळात शेतकरी आत्महत्यांची संख्याही दुपटीने वाढल्याचे स्पष्ट होत आहे. २०१५ मध्ये ३,२६६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यापैकी २,१६६ प्रकरणे सरकारी मदतीस पात्र ठरल्याने त्या कुटुंबांना प्रत्यक्ष मदत मिळाली. २०१६ मध्ये झालेल्या ३,०९१ आत्महत्यांपैकी केवळ १,८२१ आत्महत्या पात्र ठरल्या. २०१७ मध्ये २,९१८ आत्महत्यांपैकी केवळ १,६३८ आत्महत्या मदतीस पात्र ठरल्या. उर्वरित ९८८ प्रकरणे अपात्र ठरली. त्यातील २८७ आत्महत्यांची प्रकरणे अद्यापही सरकारी चौकशीच्या फेऱ्यातच अडकलेल्या आहे.  गत १२ वर्षांत २६,६४५ आत्महत्यांपैकी केवळ १३,३७० प्रकरणांत सरकारी मदत मिळाली असून, ६१५ प्रकरणांची अद्याप चौकशी सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com