जळगाव - उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाची आज जळगावात जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेबाबत शिंदे गटाचे नेते आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. त्यावर ठाकरे गटाने चोख प्रत्युत्तर दिल होतं. त्यामुळे या सभेकडे सर्वांचे लक्ष लागलं. या सभेत शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार हल्लाबोल केला.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, शिंदे गटाचं हिंदुत्व बेगडी हिंदुत्व आहे. अजित पवार यांच्या भाजपसोबत जाण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र यामुळे शिंदे गटात प्रचंड अस्वस्था आहे. या अस्वस्थेमुळे काही लोक वाटेत ते बोलू लागले. त्यांची विधाने हिंदुत्वाचं बेगडीपण दाखव होती. त्यातच गुजरातमधील वृत्तपत्रात छापून आलेल्या बातमीने अस्वस्थता आणखी वाढवली होती.
यावेळी अंधारे यांनी खारघर दुर्घटनेवरून शिंदे सरकारवर टीका केली. शिंदे यांच्या सभेला गर्दी होत नाही. सभेला भाडोत्री गर्दी गोळा केलीच, तर लोक भाषणातून मध्येच निघून जातात. त्यामुळे महाराष्ट्र भूषणचा कार्यक्रम आयोजित केला. त्यातून अमित शहांना गर्दी दाखविण्यासाठीच कार्यक्रमाच आयोजन केलं.
सुषमा अंधारे यांनी यावेळी खारघर दुर्घटनेवर राज ठाकरे यांनी केलेल्या विधानाचा देखील समाचार घेतला. राज ठाकरे यांनी म्हटलं की, कोरोना काळातही अनेक मृत्यू झाले होते. मग तेव्हा देखील अनेकांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे झाले. मग कोरोना काळात उत्तर प्रदेशात गंगा नदीवर प्रेत तरंगले तेव्हा तुम्ही का बोलले नाही, असा सवाल अंधारे यांनी राज ठाकरेंना विचारला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.