गावांत तंटामुक्‍ती दूरच ; गुन्ह्यांच्या तक्रारी वाढल्या

गावांत तंटामुक्‍ती दूरच ; गुन्ह्यांच्या तक्रारी वाढल्या

सोलापूर : राज्यात 2007 मध्ये सुरू झालेल्या महात्मा गांधी तंटामुक्‍त अभियानाला 2013 पर्यंत मोठे यश मिळाले. गावातील तंट्यांचे प्रमाण कमी झाल्याने पोलिसांवरील ताणही कमी झाला. परंतु, मागील दोन- तीन वर्षांपासून तंटामुक्‍ती समित्या नावालाच दिसून येत आहेत. त्यातच पोलिसांकडूनही सहकार्य मिळत नसल्याने तंटामुक्‍ती समित्यांचे अध्यक्षही तंटे मिटविण्यापासून चार हात लांबच राहत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 

गावातील तंटे गावातच मिटावेत आणि शांतता, सुव्यवस्था अबाधित राहावी, गावाचा विकास व्हावा आणि पोलिस प्रशासनावरील ताण कमी व्हावा या उद्देशाने तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी महात्मा गांधी तंटामुक्‍त मोहीम सुरू केली. परंतु, त्याचा प्रभाव सरकारच्या उदासीनतेमुळे दिसत नसल्याने किरकोळ व गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे गुन्ह्यांची संख्या कमी करण्याकरिता सरकारला स्वतंत्र परिपत्रक काढावे लागले. त्यानुसार पुरावे नसलेले खटले पोलिस ठाण्यातच निकाली काढावे लागणार आहेत. 

तंटामुक्ती मोहिमेतील गावांची स्थिती 

1,223 
तंटामुक्त 

13,267 ----------हजार 
तंटामुक्‍त समित्यांची नियुक्ती 

26,410 
समित्या नावालाच 

9 लाख 
पहिल्या चार वर्षांत सामोपचाराने मिटविले तंटे 

10 लाख 
- मागील चार वर्षांतील तंट्यांतील वाढ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com