सोलापूर - विनाहेल्मेट दुचाकी चालविणे, वाहन चालवितानाचा निष्काळजीपणा, बेशिस्त वाहतूक, अतिवेगाने अथवा मद्यपान करून वाहन चालविणे आणि रस्त्यांवर वाढलेल्या खड्ड्यांमुळे जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीतील २५ हजार १३० अपघातांमध्ये १० हजार २३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये सर्वाधिक विनाहेल्मेट दुचाकीस्वारांची संख्या अधिक आहे.
दरवर्षी देशात सरासरी एक लाख जणांचा अपघाती मृत्यू होतो. देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात दरवर्षी ३५ हजार अपघात होतात अन् त्यामध्ये सुमारे २२ ते २५ हजार जणांचा मृत्यू होतो. मागील चार-पाच वर्षांपासून ते प्रमाण कमी झालेले नाही. अपघात रोखण्यासाठी जिल्हास्तरावर रस्ता सुरक्षा समिती कार्यरत असतानाही अपघात कमी झाले नसून, अपघातप्रवण ठिकाणेही (ब्लॅक स्पॉट) कमी झालेली नाहीत. रस्त्यांवरील खड्डे, वाहनांचा वाढलेला वेग, मद्यपान करून निष्काळजीपणे वाहन चालविणे, विनाहेल्मेट वाहन चालविणे आदी कारणांमुळे अपघात वाढले असून, आता त्यावर ठोस उपायासाठी स्वतंत्र समिती नियुक्त करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे राष्ट्रीय महामार्ग पोलिसांनी सांगितले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.