Shivsena : उद्धव ठाकरे 'त्या' चुकीमुळे येणार गोत्यात; सत्तासंघर्षाच्या प्रकरणाला कलाटणी मिळणार?

उद्धव ठाकरे यांच्या ‘त्या’ घोडचुकीवर सरन्यायाधीशांचं मोठं विधान
shiv sena power struggle uddhav thackrey eknath shinde supreme court decision Maharashtra Political Crisis
shiv sena power struggle uddhav thackrey eknath shinde supreme court decision Maharashtra Political Crisis esakal

महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावरील सुप्रीम कोर्टातील सुनावणीचा आजचा तिसरा दिवस आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी जवळपास अडीच दिवस युक्तिवाद केला आहे. आजही सकाळी (23 फेब्रुवारी) कपिल सिब्बल युक्तिवादाने कामकाजाची सुरुवात झाली. आजची सुनावणीही निर्णायक टप्प्यावर पोहोचली. उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा ही त्यांची चूक असल्याचं महत्त्वाचं निरीक्षण सरन्यायाधीशांनी यावेळी नोंदवले आहे. जर, बहुमत चाचणीला सामोर गेला असता तर आम्ही ती चाचणी रद्द ठरवली असती, असंही कोर्टाने यावेळी स्पष्ट केलं आहे.

आज सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. एम. आर. शहा, न्या. कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली, न्या. पी.एस. नरसिंहा या 5 जणांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू झाली. उद्धव ठाकरे गटाचे जेष्ठ वकील प्रथम कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद केला आहे. आजच्या सुनावणीमध्ये बहुमत चाचणी, राज्यपालांनी घेतलेली भूमिका या सर्व घटकांवर जोरदार युक्तिवाद झाला.

shiv sena power struggle uddhav thackrey eknath shinde supreme court decision Maharashtra Political Crisis
Thackeray vs Shinde: शिंदेंच्या बंडानंतर ठाकरे गटाकडे बहुमताचा आकडा नाही; काय म्हणाले सरन्यायाधीश...

तुम्ही बहुमत चाचणीला सामोरं गेला असता आणि 39 आमदारांमुळे हरला असता तर आम्ही ती बहुमत चाचणी रद्द केली असती असं मत सरन्यायाधीशांनी यावेळी नोंदवलं आहे. तुम्ही बहुमत चाचणीला सामोरं गेला नाही. या 39 आमदारांनी तुमच्या सरकारविरोधात कुठेही मतदान केलेलं नाही. तुम्ही बहुमत चाचणीला पुढे गेले नाही, आम्ही काय करावं उद्धव ठाकरे यांचा राजीनामा हा त्यांच्या पक्षाची मोठी अडचण असल्याचं सरन्यायाधीशांनी यावेळी सांगितलं आहे.

shiv sena power struggle uddhav thackrey eknath shinde supreme court decision Maharashtra Political Crisis
Thackeray vs Shinde: एकनाथ शिंदे दिशाभुल करण्यात पटाईत? याच जोरावर मिळवलं पक्षचिन्हं अन् नाव

तुम्ही बहुमत चाचणीला सामोरे गेला नाही. तुम्ही बहुमत चाचणीला सामोरे गेला असता आणि 39 आमदारांनी विरोधात मतदान केल्याने हरला असता तर आम्ही ती बहुममत चाचणी रद्द केली असती. पण तुम्ही राजीनामा दिल्यामुळे अधिकार गमावला आहे. आम्ही परिस्थिती जैसे थे कशी करणार?, असा प्रश्न सरन्यायाधीशांनी केला आहे. तर जे झालं ते आता आम्ही बदलू शकत नाही, असा युक्तिवाद अभिषेक मनु सिंघवी यांनी केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com