जिल्हा परिषद ‘सीईओं’चे आदेश! पावसाळ्यात ‘त्या’ शाळा किंवा वर्गखोल्यात मुलांना बसवू नका

धोकादायक वर्गखोल्यांमध्ये मुलांन बसवू नका, काही दुरूस्ती असल्यास मुख्याध्यापकांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे अर्ज करावा, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत.
schools
schoolssakal

सोलापूर : पावसाळा आता सुरु झाला असला तरीदेखील अद्याप शहर-जिल्ह्यातील धोकादायक वर्गखोल्या व शाळांची दुरुस्ती झालेली नाही. दरवर्षी पावसाळ्यात वर्गात पाणी येत असल्याने मुलांना दुसरीकडे बसवावे लागते, अशी वस्तुस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर आता धोकादायक वर्गखोल्यांमध्ये मुलांन बसवू नका, काही दुरूस्ती असल्यास मुख्याध्यापकांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे अर्ज करावा, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत.

सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या दोन हजार ५९५ शाळा आहेत. त्याअंतर्गत दोन लाख दोन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पण, गतवर्षी जिल्ह्यातील ५०४ शाळांच्या बाराशेंवर वर्गखोल्या धोकादायक होत्या. पण, जूनमध्ये शाळा सुरु होण्यापूर्वी सीईओ स्वामी यांनी सर्व गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापकांची बैठक घेऊन त्यातील बऱ्याच ठिकाणची दुरुस्ती करून घेतली आहे. तरीसुद्धा अनेक शाळांमधील वर्गखोल्या पावसाळ्यात गळतात, काही शाळा जुन्या आहेत. त्यामुळे पाऊस सुरु असताना संबंधित मुख्याध्यापकांनी त्या वर्गातील मुलांना दुसरीकडे बसवून त्यांचे अध्यापन करावे.

मुख्याध्यापकांनी त्यांच्या शाळांमधील धोकादायक वर्गखोल्यांची माहिती कळवावी, असेही त्यांना आदेश देण्यात आले आहेत. अजून आपल्याकडे अपेक्षित पावसाला सुरवात झालेली नाही. त्यामुळे नेमक्या किती वर्गखोल्या किंवा शाळा नादुरूस्त आहेत, हे स्पष्ट झालेले नाही. तरीपण, गटशिक्षणाधिकाऱ्यांनी बांधकाम विभाग व गटविकास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ती कामे तातडीने करून घ्यावीत. निधी कमी पडल्यास मागणी करावी, असेही श्री. स्वामी यांनी अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितले आहे.

प्रशासनाधिकाऱ्यांचे ‘झोन’ला निर्देश

सोलापूर महापालिकेच्या शहरात ५८ शाळा असून त्यात साडेपाच हजार विद्यार्थी शिकत आहेत. मागील वर्षी अनेक शाळांच्या वर्गखोल्यांमध्ये पाणी टिपकत असल्याने मुलांना त्याठिकाणी शिकणे मुश्किल झाले होते. काही शाळांमध्ये शिक्षकांना बादल्या ठेवाव्या लागल्या होत्या. या पार्श्वभूमीवर प्रशासन अधिकारी विठ्ठल ढेपे यांनी शहरातील आठ विभागीय कार्यालयांना पत्रव्यवहार करून त्यांच्या विभागातील महापालिकेच्या शाळांमधील वर्गखोल्यांची दुरूस्ती करून घेण्याच आदेश दिले आहेत. आता कधीपर्यंत त्याची दुरुस्ती होणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

मुख्याध्यापकांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना कळवावे

जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व धोकादायक शाळा व वर्गखोल्यासंदर्भात मागील महिन्यात बैठक पार पडली. त्यात त्याच्या दुरुस्तीच्या सूचना करून डागडुजी करण्यात आली आहे. अजूनही कोठे तशी गरज भासल्यास मुख्याध्यापकांनी थेट गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार करावा. पण, धोकादायक वर्गखोल्यात मुलांना बसवू नये.

- दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी, सोलापूर जिल्हा परिषद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com