Tur Dal Rate: खिशावर भार पडणार! तूरडाळ गाठणार १७०चा आकडा; साठवणुकीमुळे...

Nagpur Tur Dal Rate
Nagpur Tur Dal Rate

Tur Dal Rate: कॉर्पोरेट कंपन्यांनी केलेल्या साठवणुकीमुळे यावर्षी तूरडाळीची कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी, गेल्या आठ दिवसात तूरडाळीच्या दरात प्रति किलो सात रुपयांची वाढ झालेली आहे.

प्रतिकूल वातावरणाचा फटका बसल्याने येत्या काही दिवसात डाळीचे भाव १५० ते १७० रुपयांवर जाण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. सध्या तुरीचे भाव ठोक बाजारात ११७ ते १३४ रुपये प्रतिकिलो प्रमाणे आहेत. (Latest Marathi News)

Nagpur Tur Dal Rate
Sameer Wankhede : मोहन भागवतांच्या भेटीनंतरच वानखेडेंच्या मागे चौकशीचा ससेमिरा; 'त्या' दाव्याने खळबळ

सर्वसामान्यांच्या ताटातील पौष्टिक खाद्य पदार्थ म्हणून डाळींकडे पाहिले जाते. आता डाळ महाग झाल्याने घरात खावे तरी काय असा प्रश्न पडू लागला आहे.

येत्या काही दिवसात तूरडाळीचे दर १५० रुपये प्रतिकिलो पर्यंत पोहचण्याचे संकेत आहे. केंद्र सरकारने वेळीच हस्तक्षेप न केल्यास तूरडाळीचे भाव पुन्हा एकदा प्रति किलो २०० रुपयावर जाईल असे बोलले जात आहे.

आघाडीच्या कॉर्पोरेट कंपन्यांनी तूर बाजारात आल्यानंतर मोठ्या प्रमाणात त्याची खरेदी करून साठा केलेला आहे. त्यामुळे बाजारात डाळीची आवक कमी झालेली असताना मागणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. (Marathi Tajya Batmya)

परिणामी गेल्या महिन्याभरात या डाळीच्या दरात प्रति किलो ३० रुपयाची वाढ झालेली आहे. केंद्र सरकारने हस्तक्षेप न केल्यास सर्वसामान्यांच्या ताटातून तूरडाळ गायब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Nagpur Tur Dal Rate
Sameer Wankhede : मोहन भागवतांच्या भेटीनंतरच वानखेडेंच्या मागे चौकशीचा ससेमिरा; 'त्या' दाव्याने खळबळ

कमी लागवडीचाही फटका

आवक कमी झाली असतानाच साठेबाजांनी तुरीची साठवण केलेली आहे. त्यामुळेच दरवाढ होत असल्याची चर्चा सुरू आहे. मार्च महिन्यात तूरडाळीचे भाव प्रतिक्विंटल १०५ ते ११० रुपये होते. ते ११७ ते १३५ रुपयांवर पोहोचले आहेत.

यंदा तुरीच्या उत्पादनात ३० टक्के घट झाल्याची माहिती आहे. देशातही तुरीचा अल्पसाठा आहे. त्यामुळेच पुढे तूरडाळीच्या दराचा आलेख वाढू लागला आहे.

ही भाव वाढ लक्षात घेता वर्षभराची तूर साठवून ठेवण्याकडे ग्राहकांचा कल वाढल्याचे चित्र असल्याचेही व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. मागील हंगामात हमीभावापेक्षा कमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी तुरीची लागवड कमी केली. त्यातच पावसामुळे उत्पादनात घट आली.

उन्ह तापू लागल्याने वर्षभराच्या धान्य खरेदीला वेग आला आहे. त्यात गव्हाची विक्री वाढलेली असताना अवेळी आलेल्या पावसामुळे गव्हाचे उत्पादन कमी झाले. परिणामी गव्हाच्या दरात प्रति किलो एक रुपयाची वाढ झालेली आहे. अजूनही भाव अपेक्षित आहे.

सोयाबीन तेलाच्या दरात पुन्हा किंचित वाढ झालेली आहे. येत्या काळात खाद्य तेलाच्या दरात वाढ होण्याची शक्यता कमी आहे. शेंगदाणा तेलाचे दर स्थिरावलेले आहे. तूर डाळीच्या दरात अजून भाववाढ अपेक्षित आहे.

प्रभाकर देशमुख, अध्यक्ष किरकोळ किराणा व्यापारी संघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com