राज्यात पुन्हा भारनियमन नाही : बावनकुळे

There is no loadshading in Maharashtra says Power Minister Chandrashekhar Bawankule
There is no loadshading in Maharashtra says Power Minister Chandrashekhar Bawankule

मुंबई : कोळशाची टंचाई निर्माण झाल्याने राज्यात भारनियमन सुरु करण्यात आले होते. मात्र, दिवाळीदरम्यान हे भारनियमन बंद करण्यात आले होते. त्यानंतर आता हे बंद झालेले भारनियमन राज्यात पुन्हा सुरु होणार नाही, अशी माहिती राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

''राज्यातील कोळशाची तूट भरून काढण्यात आली आहे. आता वीजकेंद्रांमध्ये कोळशाचा पुरेसा साठा उपलब्ध झाला आहे. राज्यात विजेसाठी योग्य नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे दिवाळीत बंद करण्यात आलेले भारनियमन आता पुन्हा सुरू होणार नाही", असे बावनकुळे यांनी सांगितले. तसेच राज्यातील बहुतांश भागात थकीत वीजबिलांचा प्रश्न गंभीर आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी शक्य असेल तेवढी रक्कम जमा करावी, असे आवाहनही बावनकुळे यांनी यावेळी केले. 

दरम्यान, ऑक्टोबर महिन्यात राज्यातील जनतेला भारनियमन सहन करावे लागले होते. मात्र, आता हे भारनियमन बंद होणार असल्याने राज्यातील जनतेला याचा दिलासा मिळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com