पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना यंदा घरपोच प्रगतीपुस्तके; दहावी-बारावीचा निकाल ‘या’ दिवशी लागणार

प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांचा निकाल २९ एप्रिल किंवा उन्हाळा सुटीत जाहीर होणार आहे. निकालानंतर प्रगतीपुस्तके घ्यायला विद्यार्थ्यांना शाळेत बोलावू नये, असे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांना दिले आहेत. यंदा घरपोच प्रगतीपुस्तके मिळणार आहेत.
Solapur News
Solapur Newssakal

सोलापूर : कडक उन्हामुळे उष्माघाताची भीती वर्तविण्यात आली असून प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांचे निकाल २९ एप्रिल किंवा उन्हाळा सुटीत जाहीर केला जाणार आहे. निकालानंतर प्रगतीपुस्तके घ्यायला विद्यार्थ्यांना शाळेत बोलावू नये, असे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व मुख्याध्यापकांना दिले आहेत. विद्यार्थ्यांना यंदा घरपोच प्रगतीपुस्तके मिळणार आहेत.

सोलापूर जिल्ह्याच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. दररोज जिल्ह्याचे तापमान सरासरी ४० सेल्सिअंशपर्यंत आहे. दरवर्षी १ मे रोजी शाळांचे निकाल प्रसिद्ध होतात. त्यावेळी विद्यार्थ्यांसह पालकांना शाळांमध्ये बोलावून त्यांची प्रगतीपुस्तके दिली जातात. पण, खारघर घटनेनंतर आरोग्य विभागासह शालेय शिक्षण विभागाने शाळांना सतर्कतेच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक शाळांमधील शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या पालकांना प्रगतीपुस्तके पोच करतील, असे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

या पार्श्वभूमीवर, १ मेऐवजी आता २९ एप्रिलपर्यंत किंवा १ मेनंतर उन्हाळा सुटीत त्यांच्या सोयीने प्रगतीपुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत पोच करतील. सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७९५ शाळा आहेत. त्याअंतर्गत दोन लाख १० हजार विद्यार्थी आहेत. तेवढ्या विद्यार्थ्यांना यंदा प्रथमच घरपोच प्रगतीपुस्तके मिळणार आहेत. दरम्यान, उष्माघातामुळे १२ जूनऐवजी १५ जूनपासून शाळा सुरु होणार आहेत. दरम्यान, पहिली ते पाचवीसाठी २०० दिवस तर सहावी ते आठवीसाठी २२० दिवस अध्यापन होईल, यादृष्टीने पुढे शिक्षणाधिकाऱ्यांनी नियोजन करावे, असेही शालेय शिक्षण विभागाने आदेशातून स्पष्ट केले आहे.

विद्यार्थ्यांना घरपोच प्रगतीपुस्तके मिळतील

जिल्ह्याचे तापमान दिवसेंदिवस वाढत असल्याने उष्माघाताची भीती आहे. त्यामुळे प्रत्येक शाळांमधील मुख्याध्यापकांनी त्यांच्या शिक्षकांमार्फत विद्यार्थ्यांची प्रगतीपुस्तके त्यांच्या घरी किंवा पालकांना द्यावीत. तशा सूचना मुख्याध्यापकांना दिल्या आहेत. प्रगतीपुस्तके देण्यासाठी विद्यार्थ्यांना कोणीही शाळेत बोलावू नये.

- संजय जावीर, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर जिल्हा परिषद

दहावी-बारावीचे दोन्ही निकाल १५ जूनपूर्वी

दहावी-बारावीच्या ३२ लाख विद्यार्थ्यांचे ९० टक्के पेपर आतापर्यंत तपासून पूर्ण झाले आहेत. पहिल्यांदा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर होणार असून या विद्यार्थ्यांचा निकाल ५ जूनपूर्वी जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर इयत्ता दहावीचा १५ जूनपर्यंत जाहीर केला जाणार आहे. पुणे बोर्डाने त्यादृष्टिने युद्धपातळीवर नियोजन केले आहे. दोन्ही निकाल जूनमध्येच लागतील, असे बोर्डाच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com