Tuljapur : तुळजाभवानी मंदिरातील दागिने वितळवण्यास अखेर परवानगी; 204 किलो सोनं अन्...
मुंबईः तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीला अर्पण केलेले दागिने वितळवण्यास राज्याच्या विधी व न्याय विभागाने मंजुरी दिलेली आहे. मागच्या १४ वर्षांमध्ये देवीच्या चरणी २०४ किलो सोनं दान करण्यात आलेलं आहे.
३ हजार ८०० किलो चांदी आणि २०४ किलो सोनं वितळवण्यात यावं, अशी मागणी मंदिर समितीने केली होती. राज्यातील इतर मोठ्या देवस्थानांनी ज्या पद्धतीने सोनं वितळवलं होतं, त्याच पद्धतीने तुळजापूर देवस्थानाने वितळावं, असं आदेशात म्हटलं आहे.
देवस्थानने जुलै आणि ऑगस्ट २०२३ या महिन्यांमध्ये ठराव घेऊन मौल्यवान वस्तू वितळवून ते बँकेत ठेवण्याबाबत ठराव घेतला होता. उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत राज्य शासनाकडे त्यासंबंधीची परवानगी मागितली होती.
तुळजाभवानी देवस्थानकडे दागिन्यांचे दोन खजिने आहेत. यामध्ये एक भाविनांनी देवीला अर्पण केलेले दागिने आणि दुसरा देवीच्या अंगावरील पुरातन दागिने. त्यापैकी केवळ भाविकांनी दान केलेले दागिने वितळवण्याची परवागी मागण्यात आलेली होती. राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाने ती परवानगी दिलेली आहे.
राज्य शासनाने आदेशामध्ये दागिन्यांची व्यवस्थित हाताळणी, वितळवण्याची प्रक्रिया, सुरक्षितता, नोंदी ही कामं पारदर्शकपणे करण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय दहा किलो वजनाचे दागिने साठल्यानंतर वितळवण्याची प्रक्रिया करावी, असंही आदेशामध्ये म्हटलंय.
महाराष्ट्रातील तसेच राज्याबाहेरील भाविक मोठ्या श्रद्धेने देवीला दागदागिने, मौल्यवान वस्तू अर्पण करत असतात. परंतु या वस्तू वर्षानुवर्षे तशाच राहतात, त्या जतन करणंही अवघड काम होतं. त्यामुळे सोन्या-चांदीचे दागिने वितळवण्याची परवानगी देवस्थानने केली होती.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.