वाघनखं खरी की खोटी? उदयनराजेंनी राजवाड्यातील मोठ्या चोरीचा सांगितला इतिहास, नेमकं काय घडलं?

वाघनखं (Waghnakh) खरी की खोटी, याबाबत त्यावेळी माझा जन्मच झाला नव्हता.
Waghnakh Udayanraje Bhosale
Waghnakh Udayanraje Bhosaleesakal
Summary

मुळात वाघनखं ज्यावेळी होती, त्यावेळी माझा जन्मच झाला नव्हता. त्यामुळे तर मला हा प्रश्न विचारून उपयोग नाही.

सातारा : वाघनखं (Waghnakh) खरी की खोटी, याबाबत त्यावेळी माझा जन्मच झाला नव्हता. त्यामुळे हा प्रश्न मला विचारून उपयोग नाही, असे विधान भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी पत्रकार परिषदेत वाघनखांबाबतच्या विचारलेल्या प्रश्नावर केले.

दरम्यान, राज्याच्या कारभारात संपूर्ण लोकांचा सहभाग असावा, अशी संकल्पना मांडणारे छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याविषयी प्रत्येक वेळेस तारीख, तिथीबाबत वाद का निर्माण केला जातो, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Waghnakh Udayanraje Bhosale
घटस्थापनेच्या मुहूर्तावर मंत्रिपदाची 'पहिली माळ' मकरंद आबांच्या गळ्यात? साहेबांच्या बालेकिल्ल्यात दादांची हवा!

खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना वाघनखं कोणती खरी? ती चोरीला गेली होती. तीच ही आहेत का? असे विचारले. त्यावर उदयनराजे म्हणाले, ‘‘त्यावेळी माझा जन्मही झाला नव्हता. पूर्वी आमच्या या राजवाड्यात फार कमी लोक राहात असत. आम्ही सर्वजण अदालतवाड्यात राहात होतो. त्यावेळी राजवाड्यात मोठी चोरी झाली होती.

Waghnakh Udayanraje Bhosale
शिक्षक भरतीचा मार्ग अखेर मोकळा; राज्यात 13 हजार जागा भरणार, High Court कडून हिरवा कंदील

सोन्याचे देव तसेच इतर ऐतिहासिक ऐवज असे सर्व चोरीला गेले होते. त्यावेळी आजूबाजूला वस्ती नव्हती, आता ती वाढली आहे. या वाघनखांबाबत काही जणांकडे ऐतिहासिक दाखले असतील. त्याबाबत विश्‍वासार्हता असल्याशिवाय ही लोक तसेच विधान करणार नाहीत. मुळात वाघनखं ज्यावेळी होती, त्यावेळी माझा जन्मच झाला नव्हता. त्यामुळे तर मला हा प्रश्न विचारून उपयोग नाही. मला माहीतच नाही.’’

Waghnakh Udayanraje Bhosale
Loksabha Election : भाजप-धजद युतीबाबत कोणीही उघड वक्तव्य करू नका; दिल्लीतून हायकमांडचा नेत्यांना स्पष्ट इशारा

इतिहास संशोधक अनेक दावे करत आहेत, या प्रश्नावर उदयनराजे म्हणाले, ‘‘आपण देव बघितलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याच्या कारभारात संपूर्ण लोकांचा सहभाग असावा, अशी संकल्पना मांडली होती. त्यांच्याबाबत प्रत्येक वेळेस तारीख, तिथीबाबत वाद का निर्माण केला जातो? असा प्रश्न त्यांनी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com