RSS chief Mohan Bhagwat’s appeal for couples to have three children triggers political debate : प्रत्येकाने तीन अपत्यांना जन्म द्यावा, असं विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं होतं. तसेच, ७५ व्या वर्षी निवृत्त होईल, असं आपण कधीच म्हणालो नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. या विधानांनंतर आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. यावरून उद्धव ठाकरे यांनीही भाजपाला टोला लगावला आहे.