अजूनही वेळ गेली नाहीये; उद्धव ठाकरेंचं बंडखोरांना शेवटचं आवाहन

Uddhav Thackerays appeal to Shiv Sena MLAs again
Uddhav Thackerays appeal to Shiv Sena MLAs againUddhav Thackerays appeal to Shiv Sena MLAs again

मुंबई : बंड पुकारलेल्या आमदारांमुळे महाविकास आघाडीचे सरकार धोक्यात आले आहे. सरकार पडते की काय अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे व बंड करणारे आमदार गुवाहाटीतूनच चर्चा करीत आहे. ते अद्याप मुंबईत परतलेले नाही. ते केव्हा येतील याची सर्वजण वाट पाहत आहेत. अशात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बंडखोर आमदारांना शेवटचे आवाहन केले आहे. (Uddhav Thackerays appeal to Shiv Sena MLAs again)

आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात. आपल्याबाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे. आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत. आपण आजही मनाने शिवसेनेत आहात. आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत, असे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आमदारांना म्हणाले.

Uddhav Thackerays appeal to Shiv Sena MLAs again
रूपाली पाटील म्हणाल्या, सध्याची परिस्थितीत पाहता उद्धव व राज यांनी...

आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो. कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही. माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे, आपण या माझ्या समोर बसा, शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा. यातून निश्चित मार्ग निघेल. आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू, असेही आवाहन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

कोणाच्याही कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका. शिवसेनेने जो मानसन्मान तुम्हाला दिला तो कुठेही मिळू शकत नाही. समोर आलात, बोललात तर मार्ग निघेल. शिवसेना (Shiv sena) पक्ष प्रमुख आणि कुटुंब प्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे. समोर येऊन बोला आपण मार्ग काढू, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackerays appeal to Shiv Sena MLAs again
ठाणे जिल्हा प्रमुखपदी नियुक्तीबद्दल केदार दिघे यांची पोस्ट; म्हणाले...

फेसबुक लाईव्हद्वारे केले होते आवाहन

एकनाथ शिंदेंसह आमदारांनी (MLA) बंड पुकारल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला होता. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांना मुंबईत परत येण्याचे आवाहन केले होते. मुख्यमंत्री मी नको असेल तर सांगा आजच राजीनामा देतो, असे ते म्हणाले होते. मात्र, तुम्ही परत या. आपण बसून चर्चा करू, असेही उद्धव ठाकरे (uddhav thackeray) म्हणाले होते.

बंडखोर आमदारांना शेवटची संधी

एकीकडे शिवसेनेचे आमदार व खासदार बंड पुकारलेल्या आमदारांना माफ करणार नाही, असे म्हणत आहे. तुम्ही खरेच शिवसैनिक असता तर मुंबई सोडली नसती असे म्हणत आहे. धमक्या देत आहेत. अपशब्द वापरत आहे. रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहे. पक्षातील घाण साफ झाल्याचे सांगत आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना शेवटची संधी दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com