उजनी मायनस ३६.५० टक्के! शेतीसाठी आता पावसाळ्याशिवाय पाणी नाही; धरण परिसर, नदी व बंधाऱ्याजवळील वीजपुरवठ्यावर निर्बंध, जाणून घ्या किती तास वीजपुरवठा

उजनीतील मृतसाठा आता उणे 37 टक्क्यांवर असून पावसाळ्यापर्यंत धरणातील पाणी पिण्यासाठीच राखीव ठेवण्यात आले आहे. जलाशय परिसरातील वीजपुरवठा 6 तास, नदी काठावर 4 तास आणि नद्यांवरील बंधारा परिसरात 2 तास वीजपुरवठा केला जातो आहे.
उजनी धरण पाणलोट क्षेत्र
उजनी धरण पाणलोट क्षेत्रsakal

सोलापूर : उजनीतील मृतसाठा आता उणे ३७ टक्क्यांवर असून पावसाळ्यापर्यंत धरणातील पाणी पिण्यासाठीच राखीव ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यातील तीव्र पाणीटंचाईवर उपाय म्हणून उजनी जलाशय परिसरातील वीजपुरवठा सहा तास, नदी काठावरील वीजपुरवठा चार तास आणि नद्यांवरील बंधारा परिसरात दोन तास वीजपुरवठा केला जातो आहे. जेणेकरून संभाव्य पाणी टंचाईची तीव्रता कमी होईल.

दरम्यान, आता उजनी धरणातून शेतीसाठी पाणी सोडता येणार नाही. पाणी पातळी खोलवर गेल्याने कॅनॉल, उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडण्याचा पर्याय खुंटला आहे. आता पावसाळ्याशिवाय शेतीसाठी पाणीच नाही, अशी सद्य:स्थिती आहे. तीव्र उन्हामुळे होणारे बाष्पिभवन, ४७ योजनांचा पाणीपुरवठा, यामुळे आठ ते दहा दिवसाला एक टीएमसी पाणी संपत आहे. सध्या धरणातील मृतसाठा ४४.२२ टीएमसीपर्यंत असून त्यात सहा टीएमसीपर्यंत गाळ आहे. त्यामुळे ३८ टीएमसी पाण्यातील काही पाणी राष्ट्रीय हरीत लवादाच्या निर्बंधामुळे उपसा करता येत नाही. दुसरीकडे धरण उणे ६५ टक्क्यांवर गेल्यास धरणावर अवलंबून बहुतेक योजना बंद पडतात. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात पाण्याची काटकसर आतापासूनच करावी लागणार आहे. पावसाळा अजून किमान अडीच महिने दूर आहे.

मे महिन्यात सोलापूरसाठी सोडले जाईल एक आवर्तन

उजनी धरणातील मृत साठ्यातून सोलापूर शहरासाठी गरजेनुसार आणखी एक मे महिन्यात रोटेशन सोडता येईल. आता धरणातील पाणी पिण्यासाठीच राखीव ठेवले जात आहे. संपूर्ण उन्हाळ्यात धरणातील पुरेल असे नियोजन केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार उजनी जलाशय परिसर, नदी काठावरील व बंधाऱ्यांजवळील वीजपुरवठा कमी केला आहे.

- धीरज साळे, अधीक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, सोलापूर

---------------------------------------------------------------------------------------

मे महिन्यात आणखी एक आवर्तन, पण पुन्हा पाऊस लांबल्यास अडचणी

जुळे सोलापूरसह काही भागाला आजपासून (सोमवार) पाच दिवसाआड पाणीपुरवठा होईल. औज बंधाऱ्यातील पाणी १५ ते २० मेपर्यंत पुरेल आणि हिप्परगा तलावातील पाणी जूनपर्यंत पुरेल. १० मेपासून उजनी धरणातून पुढील आवर्तन सोडण्याची मागणी होईल. पाऊस लांबल्यास जुलैमध्ये धरणातून पाणी सोडणे कठीण होईल आणि त्यावेळी ‘एनटीपीसी’कडे मागणी करून त्यांच्या पाइपलाइनमधून शहराला पाणी घेण्याचे नियोजन होईल.

- व्यंकटेश चौबे, अभियंता, सार्वजनिक आरोग्य, महापालिका, सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com