No Detention Policy: शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय! 'नो डिटेन्शन पॉलिसी' रद्द, आता पाचवी-आठवीतील अनुत्तीर्ण विद्यार्थी नापासच राहणार

No Detention Policy Cancels: शिक्षण क्षेत्रात मोठे पाऊल उचलत केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने 'नो डिटेन्शन पॉलिसी' रद्द केली आहे. या निर्णयानुसार आता इयत्ता 5वी आणि 8वीच्या वार्षिक परीक्षेत नापास होणारे विद्यार्थी नापास राहणार आहेत.
No Detention Policy Cancels
No Detention Policy CancelsESakal
Updated on

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने आज 23 डिसेंबर रोजी मोठा निर्णय घेतला आहे. 'नो डिटेन्शन पॉलिसी' रद्द करण्यात आली आहे. आता इयत्ता 5वी आणि 8वीच्या वार्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण होणारे विद्यार्थी पुढील वर्गात जाऊ शकणार नाहीत. यापूर्वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करून पुढील वर्गात पदोन्नती दिली जात होती. मात्र आता असे होणार नाही. नापास झालेल्या विद्यार्थ्यांना दोन महिन्यांत पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळेल. विद्यार्थी पुन्हा अनुत्तीर्ण झाल्यास त्याला पदोन्नती दिली जाणार नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com