टॅंकरचा खर्च ५०० कोटींवर

Water Tanker
Water Tanker

जूनपर्यंतच टंचाईआराखडा; पाऊस लांबल्यास अडचणी 
मुंबई - राज्यातील जलाशयांमध्ये केवळ १३ टक्के साठा शिल्लक राहिल्यामुळे दुष्काळाची तीव्रता वाढू लागली आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त जनतेला दिलासा देण्यासाठी राज्य शासनामार्फत विविध उपाययोजना राबविण्यात येत असून, ४९२० गावे व दहा हजार ५०६ वाड्यांमध्ये ६२०९ टॅंकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना साडेचार हजार कोटींच्या मदतीचे वाटप करण्यासह विद्युत शुल्कात सवलत, शैक्षणिक शुल्कमाफी, कर्जवसुलीस स्थगिती अशा सर्व आघाड्यांवरील उपाययोजनांना गती दिली आहे.

सोलापूर - राज्यातील दुष्काळामुळे सर्वच मध्यम व लघु प्रकल्प कोरडे पडले असून, आता धरणांतील पाण्यानेही तळ गाठला आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यात सध्या सात हजार टॅंकर सुरू झाले असून, त्यावर तब्बल साडेचारशे कोटींचा खर्च झाला आहे. अनेक शहरांमध्ये ‘पाणीबाणी’ची स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, मॉन्सूनचे आगमन उशिरा होणार असल्याचे हवामान खात्याने सांगूनही शासनस्तरावरून जूनपर्यंतच पाणीटंचाईचा आराखडा तयार केला. त्यामुळे नागरिकांना जूननंतर अडचणींचा सामना करावा लागेल, असे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातील सूत्रांनी सांगितले. 

शेतीसाठी आवर्तन लांबणीवर
सोलापूर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, बुलडाणा, नाशिक यांसह अन्य काही शहरांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतीचे आवर्तन लांबणीवर पडले आहे. जनावरांना आता टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा निर्णय सरकारने घेतला, परंतु निकषांचा अडथळा मोठा असल्याने त्याची अंमलबजावणी कधीपासून होणार, असा प्रश्‍न शेतकरी विचारत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com