सोलापूर शहरासाठी उजनीतून आज सुटणार पाणी! भीमा नदीत ४५०० क्युसेकचा विसर्ग; धरण मायनस ३५ टक्क्यांवर

आषाढी वारी संपल्याने आता भीमा नदीतून सोडलेल्या पाण्याचा विसर्ग तीन ते साडेचार हजार केला जाणार आहे. सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औज बंधाऱ्याने तळ गाठल्याने सोलापूरकरांसाठी उद्यापासून (शनिवार) पाणी सोडले जाणार आहे.
ujani dam
ujani damsakal

सोलापूर : आषाढी वारी संपल्याने आता भीमा नदीतून सोडलेल्या पाण्याचा विसर्ग तीन ते साडेचार हजार केला जाणार आहे. सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औज बंधाऱ्याने तळ गाठल्याने सोलापूरकरांसाठी उद्यापासून (शनिवार) पाणी सोडले जाणार आहे. शुक्रवारी देखील पंढरीत हजारो वारकरी असतात. त्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारपासून विसर्ग वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्ह्यात अजूनही मोठा पाऊस झाला नसल्याने अद्याप पिण्याच्या पाण्याचे संकट कायम आहे. जिल्ह्यात परतीचा पाऊस जुलैनंतर पडत असल्याने धरणातील पाणीसाठा मायनस ४० टक्क्यांखाली जाणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे. यंदा मागील वर्षीच्या तुलनेत धरण लवकर मानयसमध्ये जाऊनही अधिकाऱ्यांच्या अचूक नियोजनामुळे दीड-दोन महिन्यात धरण मायनस ३५ टक्क्यांपर्यंत थांबले. सोलापूर शहरासाठी वर्षातून तीनवेळा (साधारणतः ३ टीएमसी) नदीतून पाणी सोडावे लागते.

पण, नदीतून १२ ते १५ टीएमसी पाणी सोडावे लागते. त्यामुळे उजनी लवकरच मानयसमध्ये जाते. तरीही, मायनस ७० टक्क्यांपर्यंत नदीतून पाणी सोडणे शक्य आहे. पण, मायनस ३० टक्के झाल्यावर कॅनॉल, बोगदा, उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडता येत नाही. आता पावसाळा सुरू होऊनही औज बंधाऱ्यातील पाणी संपल्याने सोलापूर शहरासाठी धरणातून पुन्हा एकदा पाणी सोडावे लागले आहे.

शनिवारी सोडलेले पाणी साधारणत: ५ जुलैला औज बंधाऱ्यात पोचेल आणि त्यानंतर ६ किंवा ७ जुलैला ते पाणी बंद केले जाणार आहे. या आवर्तनात सोलापूर शहरासाठी दोन ते अडीच टीएमसी पाणी सोडले जाणार असल्याने धरणातील पाणीसाठा मायनस ४० टक्के होईल.

‘पाइपलाइन’साठी महापालिकेचे डबल पंपिंग

सोलापूर शहरासाठी उजनीवरील पाईपलाईनमधून नियमित पाणी उचलले जाते. पण, पाइपलाइन जुनाट असल्याने अनेक ठिकाणी गळती लागलेली आहे. दरम्यान, धरणातील पाणीसाठा मायनस ३५ टक्क्यावर पोचला असून आता नदीतून सोलापूरसाठी पाणी सोडल्यावर धरण मायनस ४० टक्के होईल. त्यामुळे पाईपलाईनमधून पाणी येणे कमी होते आणि त्यासाठी तेथे दुबार पंपिंग केले जाणार आहे.

धरणातील पाण्याची सद्य:स्थिती

  • एकूण पाणीसाठा

  • ४५.२० टीएमसी

  • जिवंत पाणीसाठा

  • मायनस १८.४६ टीएमसी

  • पाण्याची टक्केवारी

  • मायनस ३४.५५ टक्के

  • भीमा नदीतून सोडला विसर्ग

  • ४५०० क्युसेक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com