Maharashtra Weather : राज्यात पुढील काही दिवस संकटाचे ! 'या' जिल्ह्यांत पावसाचा जोर पुन्हा वाढणार, जाणून घ्या हवामानाचा अंदाज

Maharashtra Rain Alert : रत्नागिरी आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर, बीड, अमरावती इत्यादी जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Heavy rain lashes Maharashtra under the influence of Montha cyclone and Arabian Sea low-pressure system; IMD issues yellow alert for several districts.

Heavy rain lashes Maharashtra under the influence of Montha cyclone and Arabian Sea low-pressure system; IMD issues yellow alert for several districts.

esakal

Updated on

Summary

  1. राज्यात पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे.

  2. बंगालच्या उपसागरातील ‘मोंथा’ चक्रीवादळ आणि अरबी समुद्रातील कमी दाब प्रणालीमुळे पावसाची स्थिती निर्माण झाली आहे.

  3. विदर्भात आज पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

राज्यातील अनेक भागांत मागील आठवडाभरापासून पाऊस कोसळत आहे.बंगालच्या उपसागरातील ‘मोंथा’ चक्रीवादळ, अरबी समुद्रातील कमी दाब प्रणालीच्या प्रभावामुळे पाऊस सुरु आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस राज्यात पावसाचा जोर राहणार आहे. दरम्यान विदर्भात पावसाचा आज जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. उर्वरित भागात विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com