

Maharashtra Weather Update: राज्यात उन्हाचा कडाका वाढत चालला असून अकोल्यात उच्चांकी तापमानाची नोंद झाली. बुधवारी अकोल्यात ४४.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. एका बाजूला तापमानाचा पारा वाढत असतानाच विदर्भात मात्र वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलाय. ७ जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामान आणि तपमान वाढ कायम राहण्याची शक्यता वर्तवली आहे.