मुंबई : ''निवडणूक जवळ आली की भाजपला आमची आठवण होते. साडेचार वर्षांत आमची आठवण आली नाही. मात्र, आता निवडणूक जवळ आली म्हणून भाजपला आमची आठवण होत आहे. जनतेमध्ये रोष आहे, त्यामुळे आता भाजपला आमची आठवण होत आहे'', अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) घटक पक्ष असलेल्या शिवसेनेकडून विविध मुद्यांवरून भाजपवर वारंवार टीका केली जात आहे. भाजपकडूनही आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात शिवसेनेशी युती करणार असल्याचे नुकतेच सांगितले होते. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, ''चार वर्षे मोठं-मोठ्या गप्पा करायच्या आणि त्यानंतर साडेचार वर्षांत आमची आठवण करायची. त्यामुळे पाचवे वर्ष धोक्याचे असते. निवडणूक जवळ आली की भाजपला आमची आठवण होते''.
तसेच 2014 च्या निवडणुकीत शिवसेनेशी युती करावी, असे कोणालाही तेव्हा वाटले नाही. भाजपने शिवसेनेशी असलेली 25 वर्षांची युती तोडली होती. त्यानंतर शिवसेना आमचा नैसर्गिक मित्र आहे, असे युतीचे भजन सुरु केले. निवडणूक जवळ आली की भाजपला आमची आठवण होते, असेही राऊत म्हणाले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.