मंत्री म्हणून घेतलेला स्वतःचाच निर्णय मुख्यमंत्री झाल्यानंतर का बदलला? - अजित पवार विचारणार जाब

पुण्यासह राज्यातील महापालिकांच्या प्रभागरचना आणि प्रभागनिहाय सदस्य संख्या निश्चित करण्याबाबतचा नगरविकास मंत्री म्हणून घेतलेला स्वतःचाच निर्णय मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी बदलला आहे.
Ajit Pawar
Ajit Pawarsakal
Summary

पुण्यासह राज्यातील महापालिकांच्या प्रभागरचना आणि प्रभागनिहाय सदस्य संख्या निश्चित करण्याबाबतचा नगरविकास मंत्री म्हणून घेतलेला स्वतःचाच निर्णय मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी बदलला आहे.

पुणे - पुण्यासह राज्यातील महापालिकांच्या प्रभागरचना आणि प्रभागनिहाय सदस्य संख्या निश्चित करण्याबाबतचा नगरविकास मंत्री म्हणून घेतलेला स्वतःचाच निर्णय मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी बदलला आहे. शिंदे यांनी स्वत:च निर्णय का बदलला, याचा जाब शिंदे यांना विधानसभेत विचारणार असल्याचे राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शनिवारी (ता.१३) पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले.

अजित पवार हे शनिवारी पुणे दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (पीडीसीसी) पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, माजी अध्यक्ष व ज्येष्ठ संचालक रमेश थोरात, आमदार अशोक पवार, बॅंकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, "राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच महाविकास आघाडी सरकारच्या काळात नगरविकासमंत्री होते. त्यांनीच नगरविकास मंत्री या नात्याने पुण्यासह राज्यातील महानगरपालिकांच्या प्रभाग रचनेचा आणि प्रभागनिहाय सदस्य संख्येबाबतचा मसुदा तयार केला आणि मंजुरीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत मांडला होता. तोच मसुदा तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने मंजूर केला होता. शिंदे यांनीच तयार केलेला हा मसुदा शिंदे यांनीच मुख्यमंत्री झाल्यानंतर बदलला आहे. पण हा बदल कशासाठी, याचा जाब त्यांना विचारण्याचा अधिकार विरोधी पक्षांना आहे. त्यामुळे शिंदे यांना विधानसभेत याचा जाब विचारणार आहोत."

राजकीय फोडाफोडी करून स्थापन केलेले राज्य सरकार हे सर्वसामान्य मतदारांना न पटलेले आहे. यामुळे आगामी निवडणुकांमध्ये मतदार सरकारबाबतची नाराजी मतपेटीतुन व्यक्त करतील. सरकार स्थापन झाल्यानंतर सुमारे सव्वामहिना दोघांचेच मंत्रीमंडळ राहते. सव्वा महिन्यानंतय विस्तार झाल्यानंतरही अद्याप खातेवाटप होत नाही, हे दुर्देव आहे.

'विकास पाहण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांचा बारामती दौरा'

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या या दौऱ्याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांना विचारले असता, ते म्हणाले, बारामतीच्या विकासकामांबाबत अनेकांना उत्सुकता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह विविध केंद्रिय मंत्र्यांनी आतापर्यंत बारामतीला येऊन येथील विकास पाहिला आहे आणि कौतुकही केले आहे. हा विकास पाहण्यासाठी सितारामन येणार असतील तर त्यांचे मी बारामतीचा लोकप्रतिनिधी म्हणुन स्वागत करतो."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com